शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आॅनलाईनचा धान्य दुकानदारांना फटका, ग्राहकांना धान्य मिळण्यास अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:35 IST

ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्याने ग्राहक व धान्य दुकानदारांचे नुकसान होते.

ठळक मुद्देवेंगुर्ले पंचायत समिती सभेत रंगली चर्चाआॅफलाईन धान्य वितरणाच्या आधारावर धान्यसाठा द्यावा

वेंगुर्ले : ग्रामीण भागात पॉस मशीनसाठी आवश्यक इंटरनेट मिळत नसल्याने मशीन निरुपयोगी ठरते. त्यामुळे ग्राहकांना रेशनवरील धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होतात. शासनाकडून आॅनलाईन विक्रीतूनच धान्य दुकानांना धान्यसाठा केला जातो. मात्र, आॅनलाईनमुळे धान्यसाठा कमी होत असल्याने ग्राहक व धान्य दुकानदारांचे नुकसान होते.त्यामुळे तालुक्यात पूर्ण क्षमतेचे इंटरनेट व सर्व्हर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आॅफलाईन धान्य वितरण करावे. तसेच आॅफलाईन धान्य वितरणाच्या आधारावर शासनाने दुकानांना धान्यसाठा द्यावा, असा ठराव पंचायत समिती सभेत करण्यात आला.वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती सदस्य यशवंत परब, श्यामसुंदर मुणनकर, मंगेश कामत, सिद्धेश परब, अनुश्री कांबळी, गौरवी मडवळ, साक्षी कुबल, प्रणाली बंगे तसेच गटविकास अधिकारी विद्याधर सुतार यांच्या उपस्थितीत झाली.तालुक्यात अनेक ठिकाणी घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या घरांमधील काही घरे बंद आहेत तर काही भाड्याने दिली आहेत. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याचे गौरवी मडवळ यांनी सभेत सांगितले.

याबाबत त्याचा सर्व्हे झाला असून लवकरच संबंधितांना नोटिसा काढणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुतार यांनी दिली. शिरोडा बसस्थानक येथील भिंतीच्या कामाचे काय झाले, या प्रश्नावर त्याची निविदा प्रक्रिया झाली असून, हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समिती सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या सूचना व ठराव तालुक्यातील जनतेसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या सूचना व ठरावांबाबत पुढे कोणती कार्यवाही झाली, त्याची माहिती प्रशासनाने पुढील सभेत ठेवावी, असा ठराव अनुश्री कांबळी यांनी मांडला. याबरोबरच इतर विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.शिष्यवृत्ती परीक्षा मध्यवर्ती केंद्रावर घ्यावी!पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा वेंगुर्ले शहरातील वेंगुर्ले हायस्कूल, पाटकर हायस्कूल व मदर तेरेसा हायस्कूल येथे होतात. तालुक्यातील टोकाच्या भागातील शाळांच्या मुलांना २० ते ३० किलोमीटर प्रवास करून परीक्षेला यावे लागते. यात त्यांना आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे केंद्र्रबलगटातील मध्यवर्ती केंद्र्रावर शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जावी, असा ठराव मंगेश कामत यांनी मांडला.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग