शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:09 IST

गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देकातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार

देवगड : गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.यावर्षी मृग नक्षत्रालाच पावसाने दमदार सुरुवात केली होती. जून व जुलै महिन्यांमध्ये भातशेती लावणीच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्याने यावर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल असे वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात पावसाने सप्टेंबर महिन्यात दडी मारल्याने तालुक्यातील कातळ भागातील भातशेती करपून गेली आहे.जून व जुलै महिन्यांत मुसळधार तर आॅगस्ट महिन्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस यावर्षी झाला. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.गेली तीन-चार वर्षे तालुक्यामधील भातशेती पीक समाधानकारक मिळत होते. याचे कारण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. येथील भातशेती ही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.शेतीसाठी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खत विकत घेतले होते. तसेच बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळून भातशेती नांगरणीसाठी पॉवर टिलर कर्ज काढून खरेदी केले आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून घेतलेले खत व पॉवर टिलर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

आंबा पीक समाधानकारक येण्याची अपेक्षादेवगड तालुक्यात भातशेती करणारेच बहुतांश शेतकरी हे आंबा बागायतदार आहेत. भातशेती व आंबापीक धोक्यात आल्यास येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. आंबा तसेच मत्स्य व्यवसायावर येथील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच उदरनिर्वाहासाठी भातशेतीही केली जाते. यावर्षी भातशेतीचे नुकसान झाले तरी आंबा व मत्स्यपीक समाधानकारक व्हावे अशी आशा येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.नाचणी शेतीही धोक्यातपुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर मळेशेती व पानथळ जमिनीतील भातशेतीही पावसाअभावी वाया जाऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. देवगड तालुक्यात काही प्रमाणात नाचणी शेतीही केली जाते. नाचणी शेतीला आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किमान तुरळक प्रमाणात पावसाची गरज असते. मात्र यावर्षी अचानक पावसाने दडी मारल्याने भातशेतीबरोबर नाचणी शेतीही वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.नुकसान भरपाईची मागणीविशेष करून तालुक्यात पुरळ, गिर्ये, वाघोटण, मुटाट, मणचे, पेंढरी, बापर्डे, नाडण, फणसगाव, तिर्लोट व पडेल या गावांमध्ये नाचणी शेती जास्त प्रमाणात केली जात आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरती तालुक्यात भातशेती केली जात आहे. तर दीड ते दोन हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते.

पावसाअभावी भात व नाचणी शेतीचे नुकसान झाल्याने कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018sindhudurgसिंधुदुर्ग