शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

कवी संमेलनात साहित्यप्रेमी भारावले

By admin | Published: October 26, 2015 11:21 PM

कुडाळ येथील ‘गारवा’ कवी संमेलन : नवोदित कवींना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद

कुडाळ : नवोदित कवींच्या ‘गारवा’ कवी संमेलनातील कवितांनी साहित्यप्रेमींना भारावून सोडले. सुमार तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कवी संमेलनातील नवोदीत कवींच्या कवीतांना प्रेक्षकांसह साहीत्यीकांनीही भरभरून दाद दिली. कोमसापच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनात जिल्ह्यातील नवोदित कवी लेखक यांना प्रोत्साहन मिळावे, याकरिता आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन घेण्यात आले होते.नवोदित कवींसाठी या साहित्य संमेलनात ‘गारवा’ या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कवीसंमेलनात मोठ्या प्रमाणात नवोदित कवींनी भाग घेतला. यामध्ये जिल्ह्यातील पे्रमलता सावंत भोसले, मधुरा आठलेकर, गोविंद पायनाईक, मृण्मयी बांदेक र, स्रेहा राणे, अनुराधा दीक्षित, सुनंदा कांबळे, प्रतिभा चव्हाण, कल्पना बांदेकर, माधुरी जोशी, गौरी सावंत बांदेकर, लॅक्सी फर्नांडिस, राज सेरगे, सुप्रिया मिराशी, अजिंक्य यादव, सतीश साळगावकर, सोनाली नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, बाजीराव काळे, अवधुत नाईक, महेश बावलेकर, अंजली मुतालिक, अनिल कांबळे, किशोर वालावलकर व इतर कवींनी आपल्या कविता सादर केल्या.या संपूर्ण साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन नीलेश जोशी यांनी केले. तर काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन साहीत्यीक प्रफुल्ल वालावलकर व हावळ यांनी केले. मुंबई येथे संपूर्ण कोकण विभागाच्या होणाऱ्या कोकण-मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसगे यांनी साहित्यिक व साहित्यप्रेमींना केले.(प्रतिनिधी)उत्साहात समारोप : रसिकांची मने जिंकलीनवकवींनी सादर केलेल्या कवितांमध्ये विविधता होती. नवरसामध्ये असलेल्या सामाजिक, राजकीय, काल्पनिक, शृंगारिक, वैचारिक अशा विविध विषयांवर केलेल्या कवितांच्या सादरीकरणामुळे साहित्यप्रेमी, श्रोते तृप्त झाले. सायंकाळी उशिरा कवी विष्णू सूर्या वाघ, शशिकांत तिरोडकर, रूजारिओ पिंटो तसेच इतर कवींनीही आपल्या कविता ‘साज’ या कवी संमेलनात सादर करून रसिकांची मने जिंकली.साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी उत्साहात समारोप करण्यात आला. यावेळी विष्णू सूर्या वाघ व महेश जावकर यांच्या हस्ते हे संमेलन पार पाडण्यासाठी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचा सत्कार करण्यात आला.