शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sindhudurg: वाफोलीत कालव्याचे निकृष्ट बांधकाम कोसळले, लाखोंचा निधी पाण्यात 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 10, 2023 12:36 IST

शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत

बांदा (सिंधुदुर्ग) : तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालवा अंतर्गत वाफोली गावातील दीड महिन्यांपूर्वी दुरुस्ती केलेल्या कालव्याचे बांधकाम कोसळले. लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याने जलसंपदा विभाग तोंडघशी पडला आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवले होते. कालवा विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केलेल्या निकृष्ट कामांबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कालवा शेतकर्‍यांसाठी, अधिकार्‍यांसाठी की ठेकेदारांसाठी ? असा खोचक सवाल वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी उपस्थित केला.तिलारी कालवा व निकृष्ट काम हे एक समीकरणच बनले आहे. तिलारी कालवा शेतकर्‍यांसाठी की ठेकेदार व अधिकार्‍यांसाठी असा प्रश्न गेली दहा वर्षे सातत्याने उपस्थित केला जात आहे. शेती व बागायतीला तिलारीचे पाणी मिळेल या भाबड्या आशेने स्थानिक शेतकर्‍यांनी लाख मोलाच्या जमिनी अत्यंत कवडीमोलाने या प्रकल्पासाठी दिल्या. मात्र, तीन तपाचा कालावधी उलटला तरीही शेतकरी मात्र अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.वाफोली हरिजनवाडी नजीक कालव्याची दुरुस्ती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करण्यात आली होती. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र याबाबत अंधारात ठेवण्यात आले. त्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत हे काम उरकले होते. त्यामुळे केवळ दीड महिन्यातच ही भिंत कोसळली व कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग