शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

अवकाळी पावसाची सिंधुदुर्गात हजेरी, भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 7:55 AM

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते.

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळीसुद्धा पावसाची रिपरिप सुरूच होती. तर सिंधुदुर्गात अजूनही भातकापणी शिल्लक असून या अवकाळी पावसामुळे भातशेती आडवी होऊन नुकसान झाले आहे.

मंगळवारी रात्री वीज चमकण्यासह ढगांचा गडगडाट जोरदार सुरू होता. त्याच्याच जोडीने जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दिवाळीपूर्वी भात कापणी संपविण्यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्नशील आहे. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आणला आहे. अनेक ठिकाणी उभे भात पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे.

बुधवारी दिवसभर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तरीही ढगाळ वातावरण कायम होते. पुढील काही दिवस सलग पाऊस झाल्यास भात शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. यापूर्वी ज्यांची भातकापणी पूर्ण झाली आहे, ते शेतकरी  नुकसानीपासून वाचले आहेत.

- या अवकाळी पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पावसाने परत जोर धरला आहे. - दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांची वाट व्यापारी बघत आहेत. त्यातच जर पावसाने पुढील काही दिवस सातत्य राखले तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे. - त्याचप्रमाणे दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचे नियोजन मनोमन केलेल्या नागरिकांचाही हिरमोड होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये  पाऊस पडू नये अशी इच्छा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग