शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नौदल भरतीत प्राधान्य द्या

By admin | Published: July 18, 2016 9:02 PM

मच्छिमारांची मागणी : अधिकाऱ्यांच्या असहकार्याविषयी नाराजी

वेंगुर्ले : नवीन नौकांना व्हीआरसी, बायोमेट्रिक कार्ड, मासेमारी परवाने द्यावे व नौदल विभागातील नोकर भरतीमध्ये मच्छिमार समाजातील तरुणांना प्राधान्य द्यावे, आदी मागण्या सागरी सुरक्षा रक्षक, मच्छिमार संस्था, प्रतिनिधी, क्रियाशील मच्छिमार व नौकाधारकांच्या बैठकीत करण्यात आली.ही बैठक भारतीय तटरक्षक व्यवस्थापन समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी दिनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले पोलिस ठाण्यात झाली. यावेळी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत दिनेश कुमार यांनी अनोळखी जहाज दिसल्यास, नौकेवरील यंत्रणेचा वापर, जीवरक्षक साधनांचा वापर, आवश्यक संपर्क यंत्रणा, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मासेमारी सुरू झाल्यानंतर परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्स येथे येऊन धुमाकूळ घालतात. बऱ्याचवेळा त्यांच्याकडे परवानेही नसतात. अशा नौकांवर कारवाई करण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना रोखता का येत नाही. याबाबत विचार व्हावा. नवीन नौकांना वर्ष-दोन वर्षे व्हीआरसी मिळत नाही. अत्यावश्यक असलेले बायोमेट्रिक कार्डही मिळत नाही, मासेमारी परवाने वेळेवर मिळत नाहीत, यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्यासाठी पोलिस विभाग, मत्स्यविभाग व मच्छिमार यांची बैठक २५ जुलैपूर्वी घेण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी ही बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य तो मार्ग काढू, असे पोलिस निरीक्षक आबाळे यांनी सांगितले. या बैठकीला मच्छिमार नेते वसंत तांडेल, मच्छिमार बाबी रेडकर, सुहास तोरसकर, मोहन सागवेकर, अनंत केळुसकर, संतोष तांडेल, गजानन कुबल, आदी ८० मच्छिमार उपस्थित होते. (वार्ताहर)आवाजाचे गूढ कायमच.... एप्रिल महिन्यात ८, १६ व १४ या तारखांना वेंगुर्ले किनारपट्टीवर तीन वेळा स्फोट सदृश आवाज आले होते. तटरक्षक प्रवीण सैदाणे, उत्तम नाविक, मनोज थापा यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही योग्य सहकार्य मिळत नाही. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली तरी अद्यापपर्यंत निदान झाले नाही. मच्छिमारांच्या या प्रश्नाला यावेळीही बगल देण्यात आली.