शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सिंधुदुर्गात पावसाची संततधार; महिन्याभरात ३९ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 04, 2024 7:18 PM

धरणे, तलावांच्या पाणी पातळीत वाढ

गिरीश परबसिंधुदुर्ग : बुधवारी रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणे, तलावांची पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळ पासून पावसाने उसंत घेतली. तर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दरम्यान गेल्या महिन्याभरात ३९ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतीयोग्य पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. बैलाच्या, यंत्राच्या साहाय्याने नांगरणी व लावणीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात सध्या शेतकरी सकाळी घर सोडून थेट संध्याकाळी माघारी परतत आहे. सकाळची न्याहरी, जेवण सर्व काही शेतात लावणीच्या ठिकाणी करताना दिसून येत आहे.दरम्यान बुधवारी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. नद्यांची धोका पातळी वाढली नसली तरी नद्यांमध्ये पाण्याचा जोर आहे. सकाळी पावसाचा जोर कमी झाला. बऱ्याच ठिकाणी ऊन पडले होते. कालच्या पावसाने २ घरांची पडझड झाली.

निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदतपाऊस सुरू झाल्यापासून दररोज घरांची पडझड झालेली अहवालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विशेष करून घरांना लागून असलेली झाडे घरावर कोसळून घरांची पडझड होत आहे. काही सरकारी मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची नोंद आहे. सरकारी व खासगी मालमत्तांच्या नुकसानीचा आकडा प्रशासनाने जाहीर केलेला नाही. पंचनाम्यानंतर निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.

९ प्रकल्प भरले; पाण्याचा विसर्ग सुरूकोरले सातंडी मध्यम पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या १० दिवसांपासून या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याच बरोबर आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, लोरे हे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस