शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

पावसाचा जोर कायम

By admin | Published: July 14, 2016 12:21 AM

पीठढवळ नदीला पूर : चार तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत

ओरोस : मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस पीठढवळ नदीला पूर आला. पुराचे पाणी महामार्गावर आल्याने महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती. या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी रात्री ११ वाजता वाहतूक ओरोसमार्गे कसाल, कट्टा, पेंडूरमार्गे कुडाळकडे, तर कुडाळ-अणावमार्गे ओरोस कणकवलीकडे वळविली. त्यामुळे तब्बल चार तासांनी महामार्ग सुरळीत करण्यात आला. रविवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. ठिकठिकाणी पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अवघ्या दीड महिन्यात निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची सरासरी पावसाने गाठली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रौद्र रूप धारण करीत रात्री उशिरापर्यंत धो-धो कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रात्री १० च्या सुमारास महामार्गावरील पीठढवळ पुलावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्गावर पाच फूट उंचावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाणी ओसरायला जवळजवळ चार तास लागले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ओरोस, सुकळवाड-कट्टामार्गे कुडाळच्या दिशेने, तर कुडाळ, अणाव, धामापूरमार्गे कसाल, कणकवलीच्या दिशेने वाहतूक वळविल्याने थोड्या प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली; परंतु अवजड वाहनांचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मार्गक्रमण झाले. (वार्ताहर) महामार्गावर पहिल्यांदाच पाणी यावर्षीच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्ग पार करून जाणाऱ्या पीठढवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्गावर पाणी आले होते. महामार्गावरून तब्बल पाच फूट उंचावरून पाणी जात होते. या नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. गतवर्षी या नदीला एकदाही पूर आला नव्हता. जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे : दोडमार्ग ११४ मि.मी., सावंतवाडी ९०, वेंगुर्ला ५८, कुडाळ ६६, मालवण ६४, कणकवली १११, देवगड ४२, वैभववाडी १५५ अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष नावापुरताच पावसाळी हंगामात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती तत्काळ प्रशासनास मिळावी, यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमध्ये घडलेल्या गंभीर घटनांची नोंदही जिल्हास्तरीय आपत्ती नियंत्रण कक्षात येत नाही. मंगळवारी महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. या घटनेची साधी नोंदही या कक्षाकडे नसल्याने हा कक्ष केवळ नावापुरताच मर्यादित राहिला आहे.