शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कणकवलीत राणेंच्या ‘स्वाभिमान’चा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:05 IST

कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीने थेट नगराध्यक्ष व १७ पैकी ११ जागा जिंकून स्वाभिमानचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकहाती विजय मिळवून विरोधकांना धूळ ...

कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीने थेट नगराध्यक्ष व १७ पैकी ११ जागा जिंकून स्वाभिमानचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकहाती विजय मिळवून विरोधकांना धूळ चारली आहे.‘स्वाभिमान’च्या समीर नलावडे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या संदेश पारकर यांचा अतिशय अटीतटीच्या लढाईत अवघ्या ३७ मतांनी पराभव करीत यश प्राप्त केले. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले. स्वतंत्रपणे लढणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला या निवडणुकीत आपले खाते खोलता आलेले नाही. मात्र, स्वाभिमानशी आघाडी केल्याने राष्ट्रवादीला अबिद नाईक यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. पक्ष स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक लढविणाºया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली होती. त्यातच नारायण राणे व त्यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांच्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्राबल्य!कणकवली नगरपंचायत निवडणूक निकालानंतर नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच प्राबल्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला तीन, शिवसेनेला तीन, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला नगरसेवक पदाच्या १० जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा मिळविली आहे, तर काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला एकही जागा मिळविता आलेली नाही.जनतेचा कौल मान्य : संदेश पारकरकणकवली नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढाई झाली. आमचे उमेदवार अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. जनतेचा कौल आपल्याला मान्य आहे. येत्या पाच वर्षांत आणखीन काम करून पुढील निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी यावेळी दिली.समीर नलावडे नगराध्यक्ष!कणकवली नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) विजयी झाले आहेत. त्यांना ४०९४ मते मिळाली आहेत. संदेश पारकर (भाजप) यांना ४०५७ मते, राकेश राणे (कणकवली विकास आघाडी) यांना ११४९ मते, विलास कोरगावकर (काँग्रेस) यांना २८० मते मिळाली आहेत, तर ७८ जणांनी नोटाचा वापर केला आहे.