शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

वैभववाडीचे प्रश्न सोडविण्यात राणे, जठार अपयशी

By admin | Published: October 23, 2015 9:40 PM

शैलेश भोगले : काँग्रेस आणि महायुतीला मते मागण्याचा अधिकार नाही

वैभववाडी : वाभवे-वैभववाडीच्या पायाभूत समस्या सोडविण्यात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे तसेच माजी आमदार प्रमोद जठार सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असे मत मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.येथील मनसे कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग नाईक, तालुकाध्यक्ष सचिन तावडे, महिला जिल्हाध्यक्षा भारती रावराणे, जिल्हा चिटणीस अशोक रावराणे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र सत्तेवर असताना ही मंडळी विकास करू शकली नाहीत.भोगले म्हणाले म्हणाले की, वैभववाडीचा पाणी प्रश्नही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार नीतेश राणे या प्रश्नासाठी वर्षभरात एकदाही फिरकले नाहीत. माजी आमदार जठार यांनी पाच वर्षात फक्त घोषणाच केल्या. आता सत्ता असूनसुद्धा ते काही करू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे आणि प्रमोद जठार वैभववाडीच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. तेच आता मते मागत घरोघरी फिरत आहेत.ते पुढे म्हणाले, आमदार असताना जठार यांनी एस. टी. स्थानकाचा मुद्दा उचलून धरला होता. मात्र, सत्ता आल्यावर हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे हेही या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. भाजी, मासळी, मटण मार्केट रस्त्यावर आहे. याबाबत सत्ताधारी आणि आमदार काहीच करू शकलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एकाच प्रभागात उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मनसेचा उमेदवार निवडून आल्यावर नगरपंचायतीत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचक ठेवण्याचे काम करेल, असा विश्वास भोगले यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या?एस. टी. स्थानकाच्या प्रश्नात आमदार नीतेश राणे काहीच करू न शकल्याच्या आरोपावर आमदार राणे यांच्या मागणीवरून खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी बसस्थानकासाठी २५ लाख देण्याची घोषणा केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता बसस्थानकासाठी जागेचा प्रश्न महत्वाचा आहे. जागेचाच मूळ प्रश्न सुटत नसेल तर पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या? असा सवाल शैलेश भोगले यांनी केला.