शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

राणेंचेच राजकीय अतित्व संपत चाललंय, आमदार वैभव नाईकांची टीका 

By सुधीर राणे | Updated: March 13, 2023 13:52 IST

कणकवलीत ८०० कोटींचा एजीडॉटर्स कंपनीचा प्रोजेक्ट, विनोद कांबळी क्रिकेट अकादमी, अडव्हेंचर वोटर स्पोर्ट्स प्रकल्पांचे काय झाले?

कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुख भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. मात्र, राणेंचेच राजकीय अतित्व आता संपत चालले आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागून राणेंचे कार्यकर्ते फिरत आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापुढेही तो राहणार आहे. हे खेड येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला जनतेच्या लाभलेल्या प्रतिसादामुळे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेला संपविण्याची स्वप्ने कोणी पाहू नयेत असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. कणकवली येथील विजयभवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन हजार कोटींचा निधी राज्य शासनाने कणकवली विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी दिल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले. मात्र, यापूर्वी कणकवलीत ८०० कोटींचा एजीडॉटर्स कंपनीचा प्रोजेक्ट, विनोद कांबळी क्रिकेट अकादमी, अडव्हेंचर वोटर स्पोर्ट्स असे प्रकल्पही त्यांनी आणले त्याचे काय झाले? हे येथील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे राणेंच्या घोषणा अतित्वात येणार नाहीत. याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या घोषणा सत्यात उतरल्या आहेत. ७५० कोटींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. आमदार राणे असू देत किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असू देत त्यांनी बँक निवडणुकीवेळी खावटी कर्ज माफ होईल अशी घोषणा केली  होती. मात्र, अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याबाबतची तरतूदच करण्यात आलेली नाही. दीपक केसरकर यांच्याबाबत नीलेश राणे एक मत मांडतात. तर नितेश राणे दुसरे मत मांडतात. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही राणे पुत्रांनी आपल्या वडिलांबरोबर एकत्र बसून केसरकर यांच्याबाबतची भूमिका ठरवावी. त्यानंतर ती जनतेसमोर जाहीर करावी. सत्तेसाठी आम्ही कधीही पक्ष बदल केलेला नाही. त्यामुळे शेवटचा आमदार जरी शिल्लक राहिला तरी मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार आहे. मी पंधरा वर्षे जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे त्यापदाची कोणाला तरी जबाबदारी द्यावी अशी मागणी गेली दोन वर्षे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत होतो. आता दिलेले तिन्ही जिल्हाप्रमुख सक्षम आहेत. पक्ष प्रमुख वेळोवेळी जी जबाबदारी माझ्यावर देतील, ती समर्थपणे पार पाडली जाईल. आता जरी पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आगामी निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ. त्यानंतर चिन्ह व नाव परत मिळवू असेही नाईक म्हणाले.केसरकरांनी शिवसैनिकांचा अपमान केला!आपण पैसे दिल्याने पद दिले. तसेच पैसे दिल्यानेच शिवसेना वाढली असे दीपक केसरकर सांगत आहेत. मात्र, अनेक शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी रक्त सांडले आहे. अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्या शिवसैनिकांनी केलेल्या त्यागामुळे पक्ष वाढला आहे. मात्र, केसरकर  यांनी त्या सर्व शिवसैनिकांचा अपमान केला आहे असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणेNitesh Raneनीतेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक