शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभाग सज्ज

By admin | Published: August 15, 2016 12:29 AM

राज्य मार्ग परिवहन महामंडळ : मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. मुंबईहून कोकणात २२११ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर रत्नागिरीहून मुंबईकडे परतीसाठी २०१७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणला विशेष पसंती दिली जात आहे. मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण झाले आहे. याशिवाय महामंडळाने मोबाईल अ‍ॅपव्दारे आरक्षण प्रक्रिया सुरू केल्याने प्रवाशांचा त्याकडे वाढता कल आहे. महामार्गावर प्रशिक्षण बस तसेच खास पथकाव्दारे ‘स्पेशल पेट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. गणेशोत्सव कालावधीत राज्यातील अन्य जिल्ह्यातून चालक गाड्या घेऊन येत असतात, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत सर्व बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर उसळते. त्यामुळे पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छता तसेच उपाहारगृहातून वाढीव खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. प्रत्येक आगारात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून वाहतूक नियोजनास त्याची मदत होणार आहे. एखाद्या गावातील प्रवाशांनी ४४ सीटचे एकत्रित आरक्षण केल्यास त्यांना गावासाठी खास बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दि. १ तारखेपासून कोकणात गाड्या येणार आहेत. याशिवाय नियमितच्या ८० गाड्या रत्नागिरी विभागातून धावणार आहेत. मुंबई सेंट्रल, पुणे, बोरिवली, ठाणे, भांडुप, कुर्ला नेहरूनगर, विठ्ठलवाडी, नालासोपारा, परळ, कल्याण आदी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आॅनलाईन आरक्षणामुळे मुंबईतून ७०० गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकरांच्या परतीसाठी १०पासून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)