शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शिक्षक भरतीस मान्यता द्या; मगच बदल्या करा

By admin | Published: July 05, 2017 11:01 PM

शिक्षक भरतीस मान्यता द्या; मगच बदल्या करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे ५०० पदे रिक्त आहेत. शासनाकडूनही शिक्षक भरतीला हिरवा कंदील मिळालेला नाही. एकीकडे रिक्त जागा असतानाही सिंधुदुर्ग शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून शिक्षकांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असून, जोपर्यंत शासन शिक्षक भरतीस मान्यता देत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करू नयेत, असा एकमुखी ठराव बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या ठरावामुळे आंतरजिल्हा बदलीस पात्र असणारे तब्बल ३३१ शिक्षक अडचणीत सापडले आहेत.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, विषय समिती सभापती प्रितेश राऊळ, सायली सावंत, संतोष साटविलकर, शारदा कांबळे, सदस्य सतीश सावंत, राजेंद्र म्हापसेकर, प्रदीप नारकर, अनिषा दळवी, संजय पडते, नागेंद्र परब, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीपासून ते शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदस्य प्रदीप नारकर, सतीश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ५०० एवढी शिक्षकांची रिक्त पदे आहेत. शासनाने शिक्षक भरतीस स्थगिती दिल्याने ही पदे भरता येत नाहीत. त्यातच तब्बल ३३१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जाणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा ८३१ च्या घरात जाणार आहे. असे असल्यामुळे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस आमचा विरोध असल्याचे मत सदस्यांनी नोंदविले. तसा ठरावही घेण्यात आला.दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामाची कामे, रस्त्याची कामे एकाच ठेकेदाराला दिली जात असल्याचा आरोप सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी करत ही पंचवार्षिक योजना आहे का? असा खडा सवाल उपस्थित केला. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेले रस्ते निकृष्ट पद्धतीचे आहेत. या रस्त्यावर तब्बल १० कोटी रुपये खर्च करून हे रस्ते खराब झालेले आहेत. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी म्हापसेकर यांनी केली. या प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले.अवघड व सर्वसाधारण शाळांची यादी चुकीचीशासनाने जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरविण्यासाठी शिक्षण विभागाला जिल्ह्यात अवघड व सर्वसाधारण क्षेत्रात मोडणाऱ्या शाळांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने तशी कार्यवाहीदेखील सुरू केली. मात्र, यादी तयार करताना ती चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला ह