शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

Sindhudurg: आंबोली थंडीने गारठली, पारा आठ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 25, 2024 3:51 PM

आंबोली ( सिंधुदुर्ग ) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या ...

आंबोली (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वांत निचांकी तापमानाची नोंद गुरुवारी आंबोलीत झाली असून पारा तब्बल आठ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नेहमीच गुलाबी थंडीची प्रतीक्षा असणाऱ्यांनी आंबोलीत वास्तव्यास यावे, असे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू अनुभवायचे असल्यास दक्षिण कोकणातील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण म्हणून आंबोली हिल स्टेशनकडे पाहिले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत या तिन्ही हंगामाचा आस्वाद घेत असतात.आंबोलीत साधारपणे सप्टेंबर महिन्यापासूनच थंडीचा हंगाम सुरू होतो. यावर्षी मात्र पूर्ण थंडीचा हंगाम विना थंडी गेला होता. हिवाळी हंगामाच्या सरते शेवटी आंबोलीमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आंबोलीमध्ये पारा आठ अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेले पर्यटक सुखावले आहेत.आंबा बागायतदार सुखावलाही थंडी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पडत असून कडाक्याच्या थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. कारण जर थंडी नसेल तर आंब्यांला मोहर येत नाही. या चिंतेने ग्रासलेल्या आंबा बागायतदारांनासुद्धा आता दिलासा मिळाला आहे.

आंबोलीत स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमनपक्षी वैभवसुद्धा थंडीच्या प्रतीक्षेत असते, कारण पक्ष्यांना थंडी आवडते. त्यामुळे स्थलांतर पक्षी व स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आंबोलीत पडत असलेल्या थंडीने संपूर्ण निसर्ग सृष्टी आनंदित झाली आहे. पर्यटकही या थंडीचा आस्वाद घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामान