शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट, मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी सुखावला 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 8, 2024 19:17 IST

सरासरी ४१ मिलीमीटर पावसाची नोंद

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अखेर मान्सून सक्रिय झाला असून शनिवारी सकाळपासून दमदार पावसाने बरसायला सुरूवात केल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. आता शेतीच्या कामांनी वेग घेतला असून पाणीटंचाईचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात ४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक १०२ मिलीमीटर पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला आहे. हवामान विभागाने रविवार ९ जून रोजी रेड अलर्ट दिला असून संततधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.मान्सून सिंधुदुर्गच्या वेशीवर गोव्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. त्यातच गुरूवार ६ जूनपासून मान्सून महाराष्ट्रात सक्रीय होईल, असेही जाहीर केले होते. गुरूवारी केवळ किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये अधूनमधून पाऊस कोसळत होता. तर शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात अगदी दबक्या आवाजात मान्सून दाखल झाला होता. शनिवारी मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली.

पावसाळी वातावरण कायमजिल्ह्यात मागील चार दिवसात ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती. परंतु त्यानंतर कडक ऊनही पडले होते. शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली. जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी रात्री दमदार पाऊस झाला. तर शनिवारी दिवसभर अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळनंतर पाऊस थांबला असला तरी पावसाळी वातावरण कायम होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस