शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला, परशुराम उपरकरांचा टोला

By सुधीर राणे | Updated: August 9, 2023 16:19 IST

पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीने फिरा, मग सत्य समजेल

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रखडलेल्या कामासाठी कोकणी माणूस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, हे चुकीचे आहे. कोकणी माणसाला त्यांनी बदनाम करु नये. पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीतून फिरावे, मग त्यांना सत्य परिस्थिती समजेल. 'गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला आहे', असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी केंद्रीय मंत्री गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकणातील माणसांमुळे या महामार्गाचे काम रखडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ते काम रखडण्यास ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे. गडकरी हे चांगले काम करतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. मात्र, त्यांनी विनाकारण कोकणी माणसाला दोष देऊ नये. ते आता पुस्तक लिहिणार आहेत. त्यात महामार्ग उभारताना प्रशासनाकडून कशा चुका झाल्या याबाबतही त्यांनी लिहावे.कोकण रेल्वेसाठी विना आंदोलन येथील जनतेने जागा दिली. मग फक्त मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादन करतानाच त्रास का झाला? याचा विचार त्यांनी करावा. गडकरी यांनी सध्या काम पूर्ण झालेल्या महामार्गावरून एकदा गाडीने फिरावे, त्यांना नक्कीच खरी स्थिती समजेल. त्यानंतर त्यांनी पुणे- बेंगलोर रस्त्याने गाडीने फिरावे. दोन्ही रस्त्यांच्या बांधकामातील फरक त्यांच्या लक्षात येईल. या महामार्गावरील बारा पूल बांधण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले त्याचा पूर्ण इतिहास तपासला गेला नाही त्यामुळे ते काम रखडले.दिलीप बिल्डकॉनने कणकवली येथे बांधलेला बॉक्सेल कोसळला. तसेच अनेक ठिकाणी महामार्गावर तडे गेले. काही ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे कोकणातील नागरिक कंटाळल्याने न्यायालयात गेले. वेळप्रसंगी आंदोलने केली त्याचा दोष नागरिकांना देऊ नये. महामार्ग कामाची पाहणी केली तर कणकवलीतील उड्डाणपुलावरील धबधबे आणि खड्डे दिसतील. त्यामुळे गडकरी यांनी कोकणी माणसाबद्दल बोलू नये. समृध्दी महामार्ग ज्या गतीने केला, त्या धर्तीवर हा रस्ता केला पाहिजे होता. मात्र,तसे झाले नाही असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गkonkanकोकणNitin Gadkariनितीन गडकरीParshuram Upkarपरशुराम उपरकर