शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

‘संभाजी’ चौकाला ‘बॅनर’चा विळखा

By admin | Published: July 10, 2016 11:50 PM

नागरिकांना त्रास : नगरपंचायतीचे धोरण कागदावरच; अपघाताची शक्यता

वैभववाडी : बॅनर, होर्डिंग्जमुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने धोरण ठरविले खरे! परंतु, संभाजी चौकाकडे पाहिल्यावर नगरपंचायतीचे ‘बॅनर धोरण’ कागदावरच राहिल्याचा प्रत्यय सध्या नागरिकांना येत आहे. सुशोभित केलेल्या चौकाला बॅनरचा विळखा पडला असल्याने ‘संभाजी’ चौकाऐवजी ‘बॅनर’ चौक म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले असून, या बॅनर्समुळे चौकात अपघाताची शक्यता वाढली आहे. नगरपंचायतीचा कारभार हाती घेताना नव्या कारभाऱ्यांनी कालमर्यादा ठरवून आकारमानानुसार कर भरुन घेऊन बॅनर लावण्याची परवानगी द्यावी. तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा जागी बॅनरला परवानगी देऊ नये. बॅनर लावणाऱ्यांनी निर्धारित वेळेत ते काढून नेले नाहीत तर संबंधितांकडून दंड वसूल करण्यात येईल, अशा स्वरूपाचे धोरण निश्चित करण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासूनच या धोरणाची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही. चौकातील पूर्वीच्या कठड्याच्या जागी नवीन कठडा उभारुन उंची वाढविण्यात आली. तसेच काही प्रमाणात त्याचे सुशोभिकरणही झाले. मात्र, त्यानंतर चौकाचा कठडा बॅनरसाठी अतिशय मोक्याचे ठिकाण बनला आहे. मध्यंतरी संभाजी चौकात महाराणा प्रतापसिंहांचा पुतळा उभारण्यावरुन उठलेल्या वादळानंतर या चौकात बॅनर लावूच नयेत, अशी भूमिका घेतली गेली होती. मात्र, तीही तकलादू ठरली. सध्या संपूर्ण संभाजी चौकाला चहुबाजूंनी बॅनरचा विळखा पडलेला दिसून येतो. या बॅनरमधून नगरपंचायतीला कर किती मिळाला. हा मुद्दा निराळाच आहे. विजयदुर्ग - कोल्हापूर व फोंडा -उंबर्डे या मार्गांचा संभाजी चौक दुभाजक आहे. हे दोन्ही रस्ते सतत वर्दळीचे आहेत. चौकातील बॅनरमुळे पलिकडच्या रस्त्यावरील वाहनांचा मुळीच अंदाज येत नाही. दोन रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या चौकात बॅनरला परवानगी देताना नगरपंचायतीने नागरिकांच्या आणि वाहनांच्याही सुरक्षिततेचा विचार करायला हवा. परंतु, संभाजी चौकातील सद्यस्थिती पाहता नगरपंचायतीचे बॅनर विषयक धोरण कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच रिलायन्सच्या केबलसाठी खोदलेल्या चराचा अडथळा आहेच. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना चौकातील बॅनरचा नाहक त्रास होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी) हा नगरपंचायतीचा निष्काळजीपणा बॅनरला परवानगी देताना कालमर्यादेची अट पाळणे ही जशी बॅनर लावणाऱ्यांची जबाबदारी आहे. तशीच ती मुदतीनंतर काढून टाकण्याची जबाबदारी नगरपंचायतीचीही आहे. संभाजी चौकात सध्या शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश, वाढदिवसांच्या शुभेच्छा, गुणवंतांचे अभिनंदन, मोर्चे, जयंत्या आदींचे बॅनर लागलेले आहेत. त्यातील बहुतांश बॅनर कालबाह्य झालेले आहेत. तरीही या बॅनर्सचा संभाजी चौकाला विळखा कायम आहे. मात्र, यातून नगरपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने चौकात लागणाऱ्या बॅनरवर निर्बंध घातले नाहीत; तर कालांतराने संभाजी चौकाची ‘बॅनर चौक’ अशी नवी ओळख निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.