शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच दुखणे, सतीश सावंतांची नितेश राणेंवर टीका; ..मग समजेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:07 IST

मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो

कणकवली : संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. अजून त्या दाव्याचा निकाल लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा कार्यकर्त्यांकडून स्वागताचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सुसंस्कार संपत चालल्याचा एक भाग आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत इतर मुद्यावरून राजकारण करायचे असे सत्र नितेश राणे यांनी सुरू केले आहे. अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली आहे. 

नितेश राणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर ते आजारी पडले.  केवळ न्यायालयीन कोठडीत न जाण्यासाठीच त्यांचे दुखणे होते असी जळजळीत टीकाही त्यांनी यावेळी नितेश राणे यांच्यावर केली.कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, सचिन सावंत, संतोष परब, रूपेश आमडोसकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते. 

सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय दृष्ट्या नेहमीच वैशिष्टपूर्ण राहिला आहे. पण अप्पासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने संस्कारित झालेल्या भूमीत घडत असलेल्या आताच्या राजकीय घटना पाहता समाजाच्या मानसिकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.  खर तर जिल्ह्यातील सुसंस्कारित जनतेने आता जागे व्हायलाच हवे.  नाहीतर येथील आप्पासाहेब पटवर्धन, बॅ. नाथ पै , मधु दंडवते यांचे आदर्श नव्या पिढीला समजणार नाहीत. 

न्याय देवते समोर सगळे समान आहेत हे दिसून आलेले आहे. नितेश राणेंचा घडलेल्या चुकीच्या घटनेशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी घाबरायचे काहीच कारण नाही. पण सिंधुदुर्गातील जनता सुज्ञ आहे. ती योग्य वेळी न्याय केल्याशिवाय राहणार नाही. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. खून, मारामारी दहशतीने नाही. 

नारायण राणे यांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी आहे.  ते या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या तब्बेतीची साधी चौकशी करण्याचे सौजन्य राणे यांनी दाखवले नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्री असूनही जिल्ह्यातील जनतेची त्यांना काळजी नाही हे दिसून आले. ते लोकसेवक असते तर निश्चितपणे संतोष परब यांची विचारपूस करण्यासाठी  गेले असते.

तसेच निदान या घटनेने तरी नितेश राणे  सुधारतील असे आम्हाला वाटले होते. परंतु त्यांच्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे . त्यामुळे नितेश राणे यांनी तोंड उघडावेच. मग त्यानंतर त्यांना समजेल कुणाचा बीपी वाढतो ते असेही सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे