शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:42 IST

Banking Sector Deepk kesrkar SIndhudurg : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देजिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर बँकेचा ३८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रतिपादन

ओरोस : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्यावतीने कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक मदत, जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गेल्या खरीप हंगामात जास्तीत जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, जांभूळ झाड देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सतीश सावंत म्हणाले की, बँकेचे चांगले काम आणि चांगल्या योजना यामुळेच बँकेचा एनपीए शून्य टक्के राहण्यास मदत झाली आहे. बँकेच्या सभासदांना १०.६० टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेने यांत्रिकीकरणासाठी मदत केल्यानेच जिल्ह्यात भात शेतीक्षेत्र व उत्पादन वाढले आहे. ही बँक शेतकऱ्यांची असल्याने शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता येईल का, यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदा होईल हे बँकेचे उद्दिष्ट आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळेच या बँकेने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. छोट्या योजनांसाठी कर्ज पुरवठा बँकेने केल्याने यांत्रिकीकरण वाढून शेतकरी समृध्द झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम बँक करीत असून यापुढेही हे कार्य सुरू राहील.देर आये दुरुस्त आयेचांदा ते बांदा योजना चांगली होती. मात्र या योजनेची राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी जिल्हा बँक ही योजना आपल्याकडे मागत होती. मात्र त्यावेळी सतीश सावंत हे दुसऱ्या पक्षात होते. परंतु आता ते आमच्या पक्षात आहेत. चांदा ते बांदाऐवजी सिंधुरत्न योजना सुरू झाली आहे. देर आये दुरुस्त आये असे सांगत सिंधुरत्न योजनेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करण्याची आमदार दीपक केसरकर यांनी ग्वाही दिली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत