शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

एका विचाराने प्रश्न सोडवले तरच लोकशाही टिकेल, शरद पवार यांचं मोठं विधान

By अनंत खं.जाधव | Updated: October 1, 2022 15:53 IST

Sharad Pawar: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता.आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे.जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल

सिंधुदुर्ग: बॅ.नाथ पै यांचा लोकशाही प्रणालीवर प्रचंड विश्वास होता.आजही आपल्या देशात लोकशाही टिकून आहे.जो घटक विकासापासून दूर असेल त्याला विकासाच्या प्रक्रियेत आणले पाहिजे तेथील प्रश्न एका विचाराने सोडवले तरच समृद्ध लोकशाही असलेला देश आणखी बळकट होईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले 

ते शनिवारी वेंगुर्ले  येथील  बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार बाळाराम पाटील बॅ.नाथ पै याची नात आदिती पै शैलेंद्र पै, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पद्मश्री  परशुराम गंगावणे,  बॅ.नाथ पै यांचे मित्र विठ्ठल याळगी,व्हिक्टर डाॅन्टस अमित सामंत अर्चना घारे-परब पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे संजय पडते आदि उपस्थित होते.

पवार म्हणाले,जरी बॅ.नाथ पै लहान कुटुंबात जन्माला आले होते. वडिलांचे छत्र लहान पणीच हरपले आईने छोटी मोठी कामे करून या सात भावंडाना मोठे केले काहि अंतराने बॅ.नाथ पै बेळगाव येथे गेले तेथे त्यांनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतला आणि तेथूनच बॅ.नाथ पै यांच्या कामाची सुरूवात झाली त्याचे सुरूवातीचे आयुष्य पूर्ण पणे सर्घषातून गेले नंतर  पुढे ते इंग्लंड येथे गेले आणि तेथील काहि आंदोलनात भाग घेतला अभ्यास केला त्यानंतर ते भारतात आरे तेव्हा बेळगाव येथून विधानसभा निवडणूक लढले पण पराभूत झाले पण ते मागे हटले नाहीत.पुन्हा इंग्लंड येथे गेले आणि नंतर जेव्हा पुन्हा इकडे आले तेव्हा समाजवादी विचारसरणीत सक्रीय सहभाग घेतला राजापूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले आणि त्यांनी प्रगल्भ विचार देशाला दिले आणि ते आज ही आपण पुस्तक रुपाने वाचत आहोत.

बॅ.नाथ पै यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास होता त्यांचे संसदेतील विचार ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ही हे स्वता थांबायचे ते टिका करायचे पण टिकेत व्यक्तिगत पणा नव्हती समृद्ध लोकशाही प्रणाली टिकण्यासाठी मार्गदर्शन होते.असेही पवार यावेळी म्हणाले. मंत्री  केसरकर म्हणाले,शरद पवार हे सर्वाचे  प्रेरणा स्थान आहेत बॅ.नाथ हे समाजवादी विचार सरणीचे होते समाज उन्नती साठी ते नेहमी  काम करायचे  बॅ.नाथ पै च्या स्मृती कायम राहिल्या पाहिजेत माझ्या राजकीय जडण घडणीत  पवार यांचा मोलाचा वाटा असून शांतता आणि संयम हे त्यांनीच आम्हाला शिकवल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

खासदार राऊत म्हणाले,मी संसदेत असतो तेव्हा मला मला बॅ.नाथ पै यांच्या मतदारसंघातून येत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच या  मतदारसंघाला परंपरा आहे त्यामुळे मतदार संघाला कुठे ही गालबोट लागू नये म्हणून माझा प्रयत्न असतो बॅ.नाथ पै याची गाजलेली भाषणे आम्हाला पुस्तकांतून अनुभवायला मिळावीत यासाठी लवकरच संसदेतील भाषणे पुस्तक येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. विठ्ठल याळगी यांनी नाथ पै यांच्या आठवणी जागवल्या यात नाथ  पै हे नाव घेतल कि याळगी घरण्याचे नाव कायम येत येते असे सांगत नाथ पै हे  साधे व्यक्तीमहत्व होते बेळगाव येथे सायकल वरून फिरत होते.

कधी ही त्याच्यात बडेजाव आला नाही त्यांना जंगलात शिकारीची आवड होती वाचनावर त्याचे विशेष प्रभुत्व होते 1960 सालीच बॅ.नाथ पै यांनी कोकण रेल्वे चे स्वप्न बघितल्याचे त्यांनी सांगितले ते नंतर सत्यात उतरले  महाराष्ट्राचा सीमाप्रश्न जेव्हा सुटेल तीच खरी नाथ पै यांना श्रध्दांजली असेल असे ही यावेळी याळगी म्हणाले.यावेळी आदिती पै यांच्यासह आमदार बाळाराम पाटील यांनी ही आपले विचार मांडले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdemocracyलोकशाहीIndiaभारतNCPराष्ट्रवादी काँग्रेस