शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 13:02 IST

Politics ShivSena Bjp Vinayak Raut shindhudurg- केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

ठळक मुद्देभाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले विनायक राऊत यांनी केले स्पष्ट; शहांच्या टीकेला प्रत्युत्तर

सिंधुदुर्गनगरी : केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावे लागले. अमित शहा ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल. मात्र, शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचे मंदिर आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, बाळासाहेबांच्या खोलीत ज्या चर्चा झाल्या, त्यांचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण अडवाणीही आहेत. त्याच दैवताचा आशीर्वाद नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही लाभला; म्हणूनच तर ते सध्या दिसत आहेत. नाहीतर त्यांचे काय झाले असते हे मी आता सांगू शकत नाही. गोध्रा हत्याकांड प्रकरणात बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीमागे उभे राहिले म्हणूनच ते वाचले, असा गौप्यस्फोटही खासदार राऊत यांनी केला.निवडणूक प्रचारात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहोत, असे भाजप सांगत होते. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत असे शहा यांचे म्हणणे आहे, असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, निवडणूक प्रचाराची वेळ एकमेकांना सांभाळून घ्यायची वेळ असते. त्यावेळी भांडायचे नसते. ही निवडणूक शिवसेना-भाजप असे आम्ही एकत्र लढत होतो; त्यामुळे त्यावेळी काही बोललो नाही.आम्ही फसवले नाही. निवडणूक झाल्यानंतर ज्याप्रमाणे भाजपने कृतघ्नता दाखवायला सुरुवात केली; त्यामुळे भाजपला शहाणपण शिकवणे गरजेचे होते. म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या पाठीमागून किती वेळा आरत्या फिरवत फिरायचे असा प्रश्न यावेळी खासदार राऊत यांनी करतानाच युती मोडल्याचे दुःख आम्हांला बिलकुल नाही. मात्र, ही युती तोडण्यास भाजप आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आदी कारणीभूत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.शहा-राणेंची युती लाईफ टाईम टिकोराज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शहा यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली आहे. ही युती लाईफटाईम टिकावी अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचे राजकारण सुरू आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे, ती निष्ठूरपणे राबवायची, हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्यापाठी ह्यईडीह्ण लावायची, अशी टीकाही खासदार राऊत यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Sadhअमित संधsindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत