शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

गद्दारांच्या माध्यमातून 'तो' कपटी डाव पुन्हा पूर्णत्वास आणण्याचे दिल्लीकरांचे षडयंत्र, विनायक राऊतांचा आरोप

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 08, 2022 1:19 PM

'ईडी' सरकारने लोकाभिमुख सर्व कामांना स्थगिती दिली

मालवण (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील सत्ता संघार्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी करावी अशी देशवासीयांची इच्छा आहे. घटनात्मक जो पेच निर्माण झाला आहे. तो सर्वोच्च न्यायालयातूनच सुटू शकतो त्याला दिशा मिळू शकते. लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. त्या दृष्टीने शिवसेनेच्या वतीने जे ज्येष्ठ विधिज्ज्ञ आहेत ते सर्वोच्च न्यायालयात मजबूत व खंबीरपणे बाजू मांडत असल्याचे मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.शिवसेनेची बाजू ही सत्याची आहे. आज पूर्णपणे राष्ट्रीय कार्यकारिणीचे ९५ टक्के सदस्य हे शिवसेनेबरोबर, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ४० आमदार आणि काही मोजके कार्यकारिणीचे सदस्य सोडले तर शिवसेनेच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही नसल्याचे राऊत यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त तळगाव या आपल्या गावी आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेची जी बाजू आहे ती सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली आहे. शिवाय ती निवडणूक आयोगाकडेही मांडण्यात आलेली आहे. दुर्दैवाने त्यावरील निर्णय लवकर होत नाही आहे. तो लवकरच होईल अशी आशा आहे.'तो' कपटी डाव होता गद्दारांच्या माध्यमातून पूर्णत्वास आणण्याचे षडयंत्रअमित शहा मुंबईत येऊन बोलले त्यावरून त्यांच्या जे पोटात होते ते ओठातून बाहेर आले. दुर्दैवाने त्यावेळच्या मोरारजी देसाईंना मुंबई केंद्रशासित करायची होती. ती महाराष्ट्राच्या जनतेने होऊ दिली नाही. यात अनेकांनी आपले बलिदान दिले आणि मुंबई मिळविली आहे. दुर्दैवाने आजही त्याचपद्धतीने मोरारजी देसाई यांचा जो कपटी डाव होता तो शिवसेनेतील गद्दारांच्या माध्यमातून पुन्हा पूर्णत्वास आणण्याचे षडयंत्र हे दिल्लीकरांनी राबविलेले आहे.म्हणूनच शिवसेनेची निशाणी गोठवायची, शिवसेनेच्या नावावर हक्क सांगायचा, कागदपत्रांवर हक्क सांगायचा एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही हक्क सांगायचा अशा पद्धतीने नीच वृत्ती गद्दार लोकांच्या माध्यमातून राज्यात राज्यकर्ते साकार करताहेत.महाविकास आघाडी अभेद्यराज्यातील महाविकास आघाडी अभेद्य आहे. शिवसेना संकटात असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे भविष्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तेथे महाविकास आघाडीची युती करायची की नाही हा स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा आणि लोकसभेला युती करायची की नाही हे त्यावेळेला ठरविले जाईल. सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचा आमदार निवडून येणार हे सत्य आहे हे दिसून येईल. इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत घटक पक्षांशी चर्चा करून रणनीती ठरविली जाईल.'ईडी' सरकारने लोकाभिमुख सर्व कामांना स्थगिती दिलीराज्यातील सध्याचे जे ईडी (एकनाथ-देवेंद्र) सरकार आले आहे. दुर्दैवाने या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जातीचा घटक असेल या सगळ्या घटकांसाठी उद्धव ठाकरे सरकारने जी निधीची तरतूद केली होती. अण्णासाहेब महामंडळाचे पूर्वीचे बजेट ३०० कोटीचे होते ते १ हजार कोटी केले आणि माटेकर समाजाला न्याय देण्याचे काम केले. दुर्दैवाने या ईडी सरकारने १ एप्रिल २०२१ पासूनचे लोकाभिमुख जी कामे सुचविली होती त्या सर्व कामांना स्थगिती दिली. विविध घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अनुदानासह अन्य कामांना स्थगिती देण्यात आली आहे. एकीकडे कामांना स्थगिती देत दुसरीकडे भंपक घोषणा केल्या जात आहेत. त्यांना काळजी आहे ती मुंबई-सुरत बुलेट ट्रेनची, त्यांना काळजी आहे मोठ- मोठ्या रस्त्यांची, मोठ्या प्रकल्पांची जेणेकरून सगळीकडून ओरबडता येईल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे