शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना जागा दाखवा, परशुराम उपरकर यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:31 IST

Parshuram Upkar Sindhudurg- कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

ठळक मुद्दे गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना जागा दाखवा, परशुराम उपरकर यांचे आवाहन प्रस्थापितांना जागा दाखविण्याची वेळ

कणकवली : कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनसेने कोरोना काळात सातत्याने चाकरमान्यांची बाजू घेतली. गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसांचे क्वारंटाईन करा, रॅपिड चाचणी करून त्यांना गावात प्रवेश द्या, असे आवाहन सर्वप्रथम मनसेनेच केले होते. मात्र, गावी आलेल्या चाकरमान्यांना त्रास देण्याचे काम तत्कालीन सरपंच, गावपुढारी यांनी केले.गणेशोत्सव कालावधीत अनेक चाकरमान्यांना गावागावांमध्ये मज्जाव करण्यात आल्याने त्यांना मुंबईतच गणेशोत्सव साजरा करावा लागला. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी गावी येत असतो. मात्र, या चाकरमान्यांना गावात येण्यास प्रस्थापित राजकारण्यांनी विरोध केलाचाकरमानी येण्यास मनसेने घेतला होता पुढाकारगणेशोत्सव कालावधीसाठी शासनाकडून चाकरमान्यांकरिता निकष निर्धारित करण्याअगोदरच सरपंच संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नियमावली तयार करून चाकरमान्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाकरमानी आणि त्यांचे नातेवाईक यांची मने कलुषित करण्याचा हा प्रयत्न होता. अशावेळी चाकरमानी गावात यावेत, यासाठी मनसेने सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.

आज मनसेने काही ठरावीक उमेदवार उभे केले असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याचे काम ते करणार आहेत. त्यामुळे मतदारांनी या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देत मनसेच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही उपरकर यांनी या पत्रकातून केले आहे..

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग