शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सिंधुदुर्ग : नाडणमधील कॉजवे पाण्याखाली, अमावास्येची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:20 IST

अमावास्येच्या महाकाय भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असून या भरतीमुळे नाडण वीरवाडी खाडीवरील कॉजवे पाण्याखाली जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक भरती कालावधीमध्ये बंद होत आहे.

ठळक मुद्देनाडणमधील कॉजवे पाण्याखाली, अमावास्येची भरती, किनारपट्टी भागात पाण्याचे प्रमाण वाढले

देवगड : अमावास्येच्या महाकाय भरतीमुळे किनारपट्टी भागामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असून या भरतीमुळे नाडण वीरवाडी खाडीवरील कॉजवे पाण्याखाली जात आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक भरती कालावधीमध्ये बंद होत आहे.

याबाबत वीरवाडी येथील ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे बंधाऱ्याची उंची वाढवावी अशी मागणी केली होती. मात्र, मेरीटाईम बोर्डाने याबाबत पतन विभागाकडे बोट दाखविल्याने कॉजवेची उंची वाढविण्याचा प्रश्न जैसे थे राहिला आहे.अमावास्येचा महाकाय भरतीचा वाढलेल्या पाण्याचा फटका किनारपट्टी भागाला बसत असून खाडीकिनारपट्टीलगत जाणारा वीरवाडी रस्त्याचा काही भागही पाण्याखाली जात आहे.

वीरवाडी रस्त्यावरील कॉजवेदेखील पाण्याखाली गेल्यामुळे भरती कालावधीत वीरवाडीमार्गे जाणारी मोंड बापर्डे येथील वाहतूक बंद होती. भरती संपल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

उधाणाच्या भरतीचे पाणी वीरवाडी कॉजवेवरून जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होते. त्यामुळे या कॉजवेची व वीरवाडी रस्त्यालगत खाडीकिनारी असलेल्या बंधाऱ्यांचीही उंची वाढवावी अशी मागणी वीरवाडी ग्रामस्थांनी मेरीटाईम बोर्डाकडे केली होती.

ग्रामस्थांच्या मागणीला उत्तर देताना मेरीटाईम बोर्डाने सागरी धूप प्रतिबंधक बांधकामे ही राज्यस्तरीय योजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येत आहे असे आदेश पारीत झाले असून त्यामुळे सदर काम हे पतन विभागाकडून करणे उचित होईल असे उत्तर देऊन पतन विभागाकडे बोट दाखविल्याने हा प्रश्न ह्यजैसे थेह्ण राहीला आहे.ग्रामस्थांची नाराजीकॉजवेची उंची वाढविण्याशिवाय पर्याय नसून गेली कित्येक वर्षे वीरवाडी ग्रामस्थांकडून याबाबत मागणी होऊनही शासनस्तरावरून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे हा प्रश्न सुटणार केव्हा असा सवाल वीरवाडीवासीयांमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी