शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सिंधुदुर्ग  : स्वच्छ जिल्ह्यात पाणी होतेय दूषित, आरोग्य विभागाचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:52 IST

स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्दे स्वच्छ जिल्ह्यात पाणी होतेय दूषित, आरोग्य विभागाचा सर्व्हे ग्रामीण भागात अकरा टक्के तर शहरी भागात साडेचार टक्के

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूषित पाणी नमुन्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे प्रमाण आता चिंतेची बाब बनले आहे. शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातील पाणी दूषित होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

एप्रिल अखेर तपासण्यात आलेल्या १३८० पाणी नमुन्यांपैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात ग्रामीण भागात १०.५४ टक्के तर शहरी भागात ४.४ टक्के दूषित पाणी आहे. ही टक्केवारी पाहता पाणी शुद्धिकरण मोहीम प्रभाविपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला फार महत्त्व आहे. त्यामुळेच जिल्ह्याला स्वच्छ जिल्ह्याचा पुरस्कार मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे पाणी नमुने दरमहा तपासले जातात. त्यात दूषित आढळून आलेल्या पाणी नमुन्यांच्या स्रोतांचे शुद्धिकरण केले जाते.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील १३८० पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी तब्बल १३९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यात वैभववाडी तालुक्यात दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आढळले आहे.या पाणी नमुन्यांच्या आकडेवारीवरून स्वच्छ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी दूषित होत चालले असल्याचे स्पष्ट होत आहे. यात तब्बल १०.५४ टक्के ग्रामीण भागात तर ४.४ टक्के शहरी भागात दूषित पाणी आहे. मात्र संबंधित पाणी स्रोतांचे शुद्धिकरण करण्यात आले आहे. एकंदरीत दूषित पाण्याची आकडेवारीही स्वच्छ सिंधुदुर्गला शोभनिय नाही.

टीसीएलऐवजी अन्य यंत्रणेचा शुद्धिकरणासाठी वापर व्हावामे महिना चालू असतानाच विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. तसेच पाणी साठेही आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत पाण्यात टीसीएल पावडर टाकल्यास आतील जलचर प्राणी मृत होण्याची शक्यता आहे. जलचर प्राणी पाण्यात मृत झाल्यास उपलब्ध पाणीसाठाही पिण्यायोग्य राहणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत टीसीएल पावडरऐवजी अन्य पाणी शुद्धिकरण यंत्रणेचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र तशी यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध नाही.दूषित पाण्याचा अहवालदोडामार्ग - १२३ पाणी नमुने, ८ दूषित.सावंतवाडी - २३३ पाणी नमुने, १२ दूषित.वेंगुर्ला - १२३ पाणी नमुने, १२ दूषित.कुडाळ- १८९ पाणी नमुने, ८ दूषित.मालवण - १७१ पाणी नमुने, ११ दूषित.कणकवली - २६९ पाणी नमुने, ३९ दूषित.देवगड - २४७ पाणी नमुने, ४२ दूषित.वैभववाडी - २५ पाणी नमुने, ७ दूषित.एकूण - १३८० नमुने, १३९ दूषित. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गwater pollutionजल प्रदूषण