शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठे शिंदे गटाचा प्रभाव नाही"; भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा दावा

By अनंत खं.जाधव | Updated: August 4, 2022 22:42 IST

शिंदे गटाचे कुठेही वर्चस्व दिसत नसल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सावंतवाडी : महाराष्ट्रात जरी  शिंदे  फडणवीस सरकार असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र शिंदे गटाचा कुठेच प्रभाव दिसत नाही. शिंदे गटाचा मेळावा वगैरे झाला असता तर काही चेहरे  समोर आले असते, असे स्पष्ट मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयसिंग मिश्रा हे लवकरच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ते लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संघनिहाय आढावा बैठक घेणार आहेत. या बाबतच्या नियोजनासाठी सावंतवाडीत पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तेली म्हणाले की, राज्यात शिंदे गट भाजपसोबत आघाडीत असला तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचे हे पक्षाकडून आदेश आल्यानंतर ठरविण्यात येईल. आम्ही पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळेच पक्षाचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असतो. आगामी निवडणुकीत काय भुमिका घ्यायची ते ठरवू असे सांगत तेली यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या स्वागताला जाणार का? या विषयाला बगल दिली. मात्र त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचा कुठेही प्रभाव दिसत नसल्याचे मत मांडले जर एखादा मेळावा किंवा बैठक वगैरे झाली असती तर काही चेहरे समोर आले असते पण तसे काही झाले नाही. त्यामुळे येथे शिंदे गटाचे कुठेही वर्चस्व कुठे दिसत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर शिवसेनेचे काही आजी-माजी पदाधिकारी भाजपच्या संपर्कात असून ते केव्हाही भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही त्यांनी बोलून यावेळी दाखवली.

भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदार केसरकर यांच्या विरोधात पक्षाच्या नेतृत्वाकडे तक्रारी केल्या आहेत याबाबत तेली यांना विचारले असता त्यांनी अशा तक्रारी काही झाल्या असतील तर मला माहित नाही.तसेच पक्षात लोकशाही असून कोणीही आपले मत मांडू शकतो, असेही तेली म्हणाले. तसेच भाजपचे पदाधिकारी शिवसेनेच्या कोणीही संपर्कात नसल्याचा खुलासाही तेली यांनी यावेळी केला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाRajan Teliराजन तेली