शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

मुसळधार पाऊस: सावंतवाडीसह बांदा बाजारपेठेत पाणीच पाणी, अनेक दुकानात शिरले पाणी

By अनंत खं.जाधव | Published: July 07, 2024 5:34 PM

Sindhudurg Rain Update: रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

सावंतवाडी - रविवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याला  पावसाने झोडपून काढले असून सावंतवाडी तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे.तर तेरेखोल नदीनेही धोक्याची पातळी ओलडली असून ठिकठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.सावंतवाडी व बांदा शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक दुकाने खाली करावी लागली आहेत.यात बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासून जोरदार पाऊस कोसळत आहे.रविवारी तर पावसाने आणखी जोर धरला असून तालुक्यात तर चांगलाच हाहाकार उडाला आहे.तेरेखोल नदीने आपली धोक्याची पातळी ओलडली असल्याने वाफोली बांदा दाणोली मार्गावर पाणी आले आहे.यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे.  अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत,वाहतुकही ठप्प झाली आहे. काहि गावात तर सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे. 

सकाळच्या सुमारास दाणोली बांदा मार्गावर तेरेखोल नदीचे पाणी आल्याने दोन्ही बाजू ने वाहतूक थांबवून ठेवण्यात आली पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी बॅरेकटिग केले असून दोन्ही बाजूला पोलिस ठेवण्यात आले आहेत तेरेखोल नदी ची धोक्याची पातळी वाढत जाणार तसतशी इन्सुली सह काहि गावात पाण्याची पातळी वाढत जाणार आहे.मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली येथे तर दोन्ही बाजूला पाणी आले आहे.तसेच बांदा बाजारपेठेत ही पाणी वाढत चालले असून अनेकानी सावधगिरीचा इशारा म्हणून दुकाने खाली करण्यास सुरूवात केली आहे.शेर्ले परिसरात ही पाण्याची पातळी वाढू लागली आहे.तसेच माडखोल येथे ही तेरेखोल नदीचे पाणी केव्हाही पातळी ओलडू शकते त्यामुळे तेथील ग्रामस्थांना सर्तक राहाण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महसूल विभाग व पोलिस यांच्याकडून सतत परस्थीतीवर लक्ष ठेवण्यात येत असून कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. सावंतवाडी पोलिसांनी दाणोली परिसरात जाऊन वाहतूक थांबवली आहे.

सावंतवाडी बाजारपेठेत पाणीच पाणीकधीही नाही ते यावेळी सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसले असून अनेक दुकानात पाणी गेले आहे.काहि दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानातील सामान इतरत्र हलविले आहे.रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून गांधी चौकात तर अनेक गाड्या या पाण्यात आहेत पाणी जाण्यास वाट नसल्याने पाणी तेथेच तुडुंब राहिले आहे.काहि दुकानात पाणी गेल्याने दुकानातील सामानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाचा जोर कायम राहिला तर अनेक दुकानात पाणी जाणार आहे.नगरपरिषद कर्मचारी पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न करत आहेत असे असले तर पाण्याची पातळी कमी होतना दिसत नाही त्यातच मोती तलावातील पाणी ही वाढत चालले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसSawantwadiसावंतवाडी