शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिंधुदुर्ग : धरणग्रस्तांनी जगायचे कसे? : संगीता देसाई, पाटबंधारे महामंडळाच्या अभियंत्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:14 IST

तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गावठणाची आहे. आता तुम्हीच सांगा धरणग्रस्तांनी जगायचे कसे, अशी तीव्र व्यथा कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता देसाई यांनी प्रकल्प अधिकाºयांसमोर मांडली.

ठळक मुद्देधरणग्रस्तांनी जगायचे कसे? : संगीता देसाई पाटबंधारे महामंडळाच्या अभियंत्यांना सवाल

दोडामार्ग : तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पुनर्वसन गावठणात जायला पूर्वी रस्ता नव्हता आणि आता तर मृत व्यक्तीला स्मशानभूमीत नेण्यासाठीही रस्ता नाही. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, त्यांनाच आता पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अवस्था पुनर्वसन गावठणाची आहे. आता तुम्हीच सांगा धरणग्रस्तांनी जगायचे कसे, अशी तीव्र व्यथा कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता देसाई यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडली.दक्षिण कोकण पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक तिलारी दौऱ्यावर आले असता सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. त्याचबरोबर पुनर्वसन गावठणातील धरणग्रस्तांच्या व्यथाही कथन केल्या.यावेळी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी अभियंता राकेश धाकतोडे, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस, कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई, झरेबांबर सरपंच स्नेहा गवस, कोनाळ सरपंच पराशर सावंत, खोक्रल सरपंच देव शेटकर, परमे सरपंच आनंद नाईक, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस, घोटगे उपसरपंच प्रथमेश सावंत, झरेबांबरचे माजी सरपंच पांडुरग गवस, अनिल शेटकर, संजय नाईक, मनसे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो आदी उपस्थित होते.तालुक्यातील पिकुळे, उसप, मोर्ले, खोक्रल, केर, झरेबांबर आदी गावांना धरणाचे पाणी देण्याची मागणी असताना प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करतात. मात्र नको त्या ठिकाणी प्रकल्पाचे कोट्यवधी रूपये खर्ची घातले जातात. केवळ ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी हा आटापिटा अधिकारी करताहेत, असा आरोप सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केला

 तर तिलारी धरणाशेजारी उभारलेल्या बगीचाच्या देखभालीवर पाच लाख खर्ची घालण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बागेची दुरवस्था झाली आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करीत धरणावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामात गोलमाल झाल्याचा आरोप केला. सीसीटीव्हीसाठी ३९ लाख रूपये खर्ची घालण्यात आले. पण हे कॅमेरे सहा महिनेच चालले. पण त्यानंतर ते बंद पडले. त्यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात आहे. परिणामी हे ३९ लाख गेले कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी ज्या गावांना तिलारीचे पाणी देणे शक्य आहे, त्या गावांचा सर्व्हे करून देण्याची मागणी आहे. त्या गावांचा सर्व्हे करून दोन महिन्यात बैठक लावली जाईल तसेच कु डासे खुर्दमधील प्रश्नही सोडविला जाईल, असे सांगितले.

बैठकीची फलनिष्पती काय ?सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तिलारीचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी व धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. तसेच प्रकल्पांतर्गत चाललेल्या अनागोंदी कारभाराचा पाढाही अधिकाऱ्यांसमोर वाचला. मात्र या चर्चेत ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक बाब घडलीच नाही. सरपंचांनी पोटतिडकीने मांडलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी केवळ सारवासारव केली.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरण