शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीच्या प्रवासासाठी जादा सात गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:24 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग एस टी विभाग सज्ज, परतीसाठी जादा सात गाड्याऑनलाईन बुकिंग सुरु : प्रकाश रसाळ यांची माहिती 

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी सात जादा गाड़यांची सोय करण्यात आली असून त्यांचे ऑनलाईन बुकिंग सूरू झाले आहे.अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.येथील विभागीय कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजीत पाटील तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी अनेक भाविक मुंबई, पुणे आदी भागातून येत असतात.

परतीचा प्रवास करताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी प्रशासनाने नियोजन केले आहे. 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागात सिंधुदूर्गातील विविध आगारातून सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये विजयदुर्ग - बोरीवली सायंकाळी 4 वाजता, सावंतवाड़ी -बोरीवली दुपारी 3.30 वाजता, कणकवली - बोरीवली सायंकाळी 5 वाजता, कणकवली - मुंबई सायंकाळी 4 वाजता, फोंडा- बोरीवली सायंकाळी 5 वाजता, देवगड - बोरीवली दुपारी 3.30 वाजता व सायंकाळी 4.45 वाजता . या गाड्यांचा समावेश आहे.या जादा गाडयांचे आरक्षण सुरु झाले असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या गाडयांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंत्तर आणखीन जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसे नियोजन करण्यात आले आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांमुळे एस.टी.च्या जिल्हाअंतर्गत सेवा देणाऱ्या गाडयाना गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन चांगले भारमान असलेल्या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. भविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असल्याचेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले, ठाणे येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी आतापर्यन्त 61 गाडयांचे बुकिंग झाले असून या गाड़यांची संख्या आणखिन वाढणार आहे. मुंबईच्या इतर भागातूनहि गाडयांचे आरक्षण झाले आहे.त्यांचा नेमका आकड़ा येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.असेही ते यावेळी म्हणाले.प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय !परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गाड़यांची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशानी मागणी केल्यास त्यांच्या विशिष्ट गावातून अथवा वाडीतून ग्रुप बुकिंग द्वारे गाडी उपलब्ध करून दिली जाईल. असेही प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवstate transportराज्य परीवहन महामंडळ