शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सिंधुदुर्ग :  वैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:11 IST

चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

ठळक मुद्देवैभववाडीतील चक्रीवादळ : महावितरणला सर्वाधिक फटकाखांबाळेत ३५0 काजू झाडे उद्ध्वस्त, नुकसान ५0 लाखांच्या घरात

वैभववाडी : चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. महसूल विभागाकडे प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार घरे व गोठ्यांंचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर अनेक गावातील इमारतींच्या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत झाले नव्हते.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्यातील ३७ खांब मोडून पडल्याने १५ लाखांचे नुकसान झाले आहे. तर खांबाळेतील रमेश अनाजी परब यांची ३५० काजूंची बाग उद्ध्वस्त झाली. वादळी पावसाने गुरुवारी खंडित झालेला वैभववाडी शहरातील वीजपुरवठा शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्याचा फटका विविध आस्थापनांसह शासकीय कार्यालयांना बसला.वैभववाडी तालुक्यातील अनेक गावात गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. तालुक्याच्या विविध भागातील ३७ खांब मोडून पडले. तर १५० गाळ्यातील वीजवाहिन्या तुटल्याने सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले.

त्यामुळे संपूर्ण तालुक्यात गुरुवारी रात्री अंधाराचे साम्राज्य होते. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि खासगी कंत्राटदारांचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.वैभववाडी शहरातील इमारतींच्या छप्परांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, त्यापैकी बहुतांश नोंद महसूलकडे झालेली नाही. शुक्रवारी सायंकाळपर्यंत महसूलकडे प्राप्त माहितीनुसार नावळे गावातील नुकसानग्रस्त मालमत्तांची संख्या जास्त आहे.

नावळेमधील भैरु गुरखे (९००), सावित्री सावंत (१५२५०), दिगंबर गुरव (२५००), मारुती शेळके (४२०५), लक्ष्मण शेळके (२४३५) ग्रामपंचायत कार्यालय व धनगरवाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलाही देखील या वादळाचा तडाखा बसला.सडुरे येथील भगवान बोडेकर (१०००), रवींद्र पवार (१२००), दिलीप राणे (१२००), काशीनाथ राणे (१२००), आचिर्णे येथील सावित्री झोरे(१००००), सुहास दर्डे(५००००), खांबाळेतील शिवाजी कोर्लेकर (४००००), महेंद्र बोडेकर (२००००), प्रकाश दळवी (७०००), वाभवेतील सुहास राणे (९००००), अंकुश परब (१२०००), नारकरवाडीतील दाजी बर्गे (५३७५), खांबलवाडीतील यशवंत तानवडे (२५००), मौदेतील अनंत कांबळे (३०००), सोनाळीतील अंबिका पाडावे (१२०००), पुष्पलता पाडावे (४०००), श्रीकांत पाडावे (१४०००), सदाशिव पाडावे (१३०००) यांचे घर व गोठा यांचे नुकसान झाले.

खांबाळे येथील रमेश अनाजी परब यांच्या बागेतील सुमारे ३५० काजू उन्मळून पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगवली लोकमवाडी येथील अनंत सुतार यांच्या घराचे संपूर्ण छप्पर वादळात उडाले. त्यामुळे छप्पराखाली सापडून दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

करुळ गावातील काही इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र, उशिरापर्यंत महसूलकडे आकडेवारी उपलब्ध नव्हती. त्यामुळे नुकसानीचा आकडा ५० लाखांच्यावर जाण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस व वादळाने तालुक्यात मोठी नुकसानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.अधिकाऱ्यांची भेटनावळे येथे भेट देऊन चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार जी.आर. गावीत होते. तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. लोथे यांनी तुटलेले खांब आणि वीजवाहिन्यांची पाहणी करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस