शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

चिपी विमानतळाच्या काही परवानग्या बाकी, सुरेश प्रभूंची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 09:33 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्या काही परवानग्या घेणे बाकी आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल. मात्र त्याच्या काही परवानग्या घेणे बाकी आहे. अद्याप केंद्रीय गृहखात्यांची परवानगी मिळणे बाकी असल्याची कबुली केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी दिली. या परवानग्या विमानतळ बांधणा-या कंपनीने घेणे आवश्यक होते. ते काम आता मलाच करावे लागत आहे. या परवानग्या लवकर घेतल्या जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी आणि रत्नागिरी विमानतळाचा समावेश उड्डाण तीनमध्ये करण्यात आला असल्याचे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या रेल टेल हॉटेलच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रभू म्हणाले, जगात अर्थव्यवस्थेचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे आता निरनिराळ्या  नोक-या उपलब्ध होत आहेत. ‘स्टार्टअप इंडिया’सारखे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यातूनही रोजगाराच्या संधी येत आहेत. पूर्वी रोजगाराबाबत वेगळे समीकरण होते. पण आता हे समीकरण बदलले आहे. पर्यटन तसेच सेवाक्षेत्र या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार येत आहेत. हे बदलते स्वरूप आहेत. ते आता सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे स्वरूप भारतातच नाही, तर जगात बदलले आहे, असेही मंत्री प्रभू यांनी सांगितले.सिंधुदुर्गमधील चिपी व रत्नागिरी विमानतळाचा समावेश हा उड्डाण तीनमध्ये करण्यात आला आहे. उड्डाण तीनचा शुभारंभ ८ फेबु्रवारीला होणार आहे. यावेळी या दोन विमानतळांसाठी विमान कंपन्यांची बोली लागेल आणि नंतरच हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. मात्र चिपी विमानतळाच्या काही परवानग्या येणे बाकी आहेत. गृहविभागाची परवानगी अद्याप मिळाली नाही. ती घेण्याचे काम विमानतळ तयार करणाºया कंपनीचे होते, पण तेही काम आता मलाच करावे लागत आहे. तेही काम करू आणि लवकरात लवकर हे विमानतळ सुरू केले जाईल, असे यावेळी मंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळSuresh Prabhuसुरेश प्रभू