शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘स्टॉप डायरिया’ अभियान, सीईओ मकरंद देशमुख यांची माहिती

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 10, 2024 5:34 PM

पाण्याच्या सुरक्षित वापराबाबत विविध स्पर्धा

गिरीश परबसिंधुदुर्ग : जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हावासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे.या अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गावस्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.या कार्यशाळेमध्ये पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गाव पातळीवर पोस्टर, बॅनर्स लावण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता चावडी सुरू करण्यात येणार आहे. गावातील शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत जनजागृतीग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये जैविक व अजैविक कचरा स्वतंत्र बकेटमध्ये ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांमध्ये माता व किशोरी मुलींची स्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.

सर्व शाळांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती सत्रपाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम ग्रामपंचायतने हाती घेऊन शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरुस्ती करणे, प्रत्येक शाळेमध्ये विशेष स्वच्छता संमेलन भरवण्यात यावे. यामध्ये माध्यान्ह भोजन, स्वच्छता व स्वच्छतेबद्दल जागृती सत्र घेण्यात येणार आहे.

अभियानात सर्व घटकांचा सहभाग घेणारगावामध्ये ग्रे वॉटर मॅनेजमेंटबाबत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये विशेषकरून प्रत्येक सेप्टिक टँक असलेल्या शौचालयांना शोषखड्डे तयार करणे, घरातील सांडपाणी, परसबाग किंवा शोषखड्डा करून त्यातच पाणी सोडणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे.

पाण्याच्या सुरक्षित वापराबाबत विविध स्पर्धाछतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्र/जलस्रोत इत्यादीभोवती स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शालेय स्तरावर अतिसारचा सामना करण्यासाठी सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर चित्रकला, निबंध लेखन, घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविकांकडून सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. स्टॉप डायरिया अभियान गाव पातळीवर यशस्वीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग