शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

एस.टी.च्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडू

By admin | Published: July 25, 2016 12:28 AM

मोहन केळुसकर : कोकण विकास आघाडीच्या बैठकीत दिला इशारा

कणकवली : लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करून तसेच मॅक्सीकॅबला परवानगी देऊन एस. टी. महामंडळाच्या खासगीकरणास वाव दिला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस म्हणजे ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाच्या धमण्या आहेत. एस. टी. च्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडू, असा इशारा कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दिला आहे. दादर-मुंबई येथील कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, प्रकाश तावडे, चंद्रकांत आंब्रे, रमाकांत जाधव, सुरेश गुडेकर, भिकाजी जाधव, गणपत चव्हाण, विलास गांगण आदी उपस्थित होते. केळुसकर म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि अधिकारी ग्रामीण भागातील विकासाची ही धमणी खुडण्याचे काम करीत आहेत. मात्र ग्रामीण भागातील विकासाचा चेहरामोहरा असलेल्या एस. टी. महामंडळाच्या खासगीकरणाचे प्रयत्न यापुढे चालू राहिल्यास ग्रामीण भागातील मतदार सत्ताधीशांना पुढील निवडणुकीत पायउतार केल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यातील एस. टी. महामंडळासह बेस्ट, पीएमटी, टीएमटी आदी महानगरपालिकांच्या हद्दीत चालविल्या जाणाऱ्या परिवहन सेवेच्या ठिकाणी मॅक्सीकॅबला परवानगी देण्याचे घाटत आहे. त्यामुळे एस. टी. चा तोटा आणखी वाढणार आहे. एकप्रकारे एस. टी. च्या खासगीकरणाची ही सुरुवात आहे. रस्ता तेथे एस. टी. हे बिरुद घेऊन गेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एस. टी. च्या गाड्या खेडोपाडी धावत आहेत. शेतकरी एस. टी. द्वारेच भाजीपाला आणि आपला माल शहरात आणून आपली उपजिविका चालवित आहेत. खेड्यापाड्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येवून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसायात आपले बस्तान बसवत आहेत. आजारी रुग्णांना व ज्येष्ठ नागरिकांना एस. टी. हेच प्रवासाचे, हक्काचे व्यासपीठ आहे. आज राज्यात ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेच्या त्यागातून एस. टी. महामंडळाचा पसारा वाढला आहे. राज्यात मोक्याच्या ठिकाणी महामंडळाच्या मालकीच्या अशा प्रचंड किंमतीच्या मालमत्ता आहेत. या मालमत्तांवरच राजकीय नेत्यांची वक्रदृष्टी आहे. त्यामुळेच एस. टी. च्या खासगीकरणाचा डाव आखला जात आहे. (वार्ताहर) ..तर महामंडळ फायद्यात चालेल ४वास्तविक राज्य शासनाने महामंडळाची ३ हजार कोटी रुपयांची थकबाकी तातडीने दिल्यास हे महामंडळ पूर्वीप्रमाणे फायद्यात चालू शकेल यात शंका नाही.