शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सुशांत नाईक यांनी विनाकारण जनतेत संभ्रम पसरवू नये ! : समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:34 IST

Kankavli Sindhudrugnews- शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच घट्ट बंद करावेत. मी कट्टर राणेसमर्थक असून भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत विनाकारण संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.

ठळक मुद्देसुशांत नाईक यांनी विनाकारण जनतेत संभ्रम पसरवू नये ! : समीर नलावडेभाजप जिल्हाध्यक्षांबरोबर कोणतेही पक्षीय वाद नाहीत

कणकवली : ​शिवसेना प्रवेशासाठी दरवाजे उघडे आहेत असे मला सांगणाऱ्या विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी त्यांचे दरवाजे वेळीच घट्ट बंद करावेत. मी कट्टर राणेसमर्थक असून भाजपचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जनतेत विनाकारण संभ्रम पसरवून शिवसेनेत आपले वजन वाढविण्याचा नाईक यांनी प्रयत्न करू नये असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना लगावला आहे.कणकवली येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते. ते म्हणाले की , कणकवली शहरात जनतेमध्ये व कणकवलीच्या राजकारणामध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करून आपले वजन वाढवण्याचा सुशांत नाईक यांचा प्रयत्न आहे.मी माझ्या भूमिकेशी कायम ठामच आहे. दबाव व दडपण हे शब्द माझ्या डिक्शनरी मध्ये नाहीत. नाईक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजी मार्केट विषयावर न बोलता माझ्या भूमिकेबाबत ते बोलले. त्यामुळे त्यांनी त्यांची व्यावसायिक भूमिका तपासून पाहावी.सुशांत नाईक यांनी भाजी मार्केट नगरपंचायतने विकसित करावे. अशी भूमिका मांडली आहे. ती भूमिका त्यांनी आपल्या पालकमंत्र्यांमार्फत निधी आणून पूर्ण करावी. केवळ तोंडाच्या बाता मारून आरक्षणे विकसित होत नाहीत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे , आमदार नितेश राणे व भाजपा पक्षाचा मी कट्टर कार्यकर्ता आहे. तसेच माझ्या पक्षाशी मी ठाम आहे.त्यामुळे नाईक यांनी आपले दरवाजे घट्ट बंद करून ठेवावेत. अन्यथा त्यांच्याकडचे सगळे बाहेर येऊन त्यांचे घर रिकामे होईल. जानेवारी रोजीच्या नगरपंचायत बैठकीत भाजी मार्केट बाबत मी भूमिका मांडली. ती मुख्याधिकारी व प्रशासनाला समजली आहे. यामुळे भाजी मार्केट या विषयासंदर्भात पुन्हा मला भूमिका मांडण्याची आवश्यकता नसल्याचे नलावडे यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करणे हे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते असेही ते म्हणाले.राजन तेली व माझ्यात पक्षीय वाद नाहीत . मला नगरपंचायतच्या हिताचे जे विषय वाटले ते मी मांडले. त्यामुळे नारायण राणे , नितेश राणे ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा मी कार्यकर्ता असेन. असेही समीर नलावडे यांनी यावेळी सांगितले. भालचंद्र महाराज संस्थान शेडच्या भूमीपूजनाच्यावेळी आम्ही भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या स्वागतासाठी नियोजन करत असल्यामुळे त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. मात्र नगरपंचायतने या शेडसाठी ना हरकत दिली आहे.

या कामाचा प्लान पुन्हा रिव्हाईज झाला आहे. तो देखील कायद्यात बसवून परवानगी दिली आहे. त्यामुळे या संस्थांनला आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच जर भाजी मार्केट विकासकाच्या विरोधात मुख्याधिकार्‍यांनी कायद्यानुसार कारवाई केली तर याप्रश्नी कुणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे मुख्य अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत असेही नलावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग