शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:56 IST

Sindhudurg News: एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताता. दरम्यान, आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सेतू सुविधांचं काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताता. दरम्यान, आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सेतू सुविधांचं काम गुजरातमधील कंपनीला देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने गंभीर आरोप केले असून, कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत  यांनी महायुती सरकारचा निषेध केला आहे. 

याबाबत गंभीर आरोप करताना विनायक राऊत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणाले की, राज्य सरकारच्या धोरणानुसार आपले सरकार सेवा केंद्र हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी निर्माण केलेला एक रोजगाराचा मार्ग होता. मात्र आता या भावनिक विषयाचे देखील बाजारीकरण करण्याचे धोरण राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकार करत असल्याचे सिद्ध झाले आहे. गुजराती व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जमिनी एकीकडे खुलेआम मोकळ्या करणाऱ्या राज्यसरकारने आता आपले सरकार सेवा केंद्र देखील गुजराती व्यापायांच्या कंपनीला देऊ केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्रे चक्क गुजराती कंपनी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद यांच्या हवाली करण्यात आली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत या सिंधुदुर्ग जिल्हयातील भूमीपुत्रांचा न्याय हक्क हिरावून घेणाऱ्या स्वार्थी नितीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

तर वैभव नाईक यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करताना सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी देण्यात आली आहे. दि. ०९/०१/२०२५ पासून या ९ सेतू सुविधा केंद्रांचे कामकाज सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कंपनीला वर्कऑर्डर दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार गुजरातच्या उद्योजकांच्या फायद्यासाठीच कार्यरत असून सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला देऊन महायुती सरकारने सिंधुदुर्गातील सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार व कर्मचारी यांचा रोजगार हिरावला आहे. सेतू सुविधा केंद्रांसाठी लावण्यात आलेल्या निकषांमध्ये जिल्ह्यातील कंत्राटदार पात्र होणार नाहीत तसेच आपल्या मर्जीतील गुजराती कंपनीला टेंडर मिळेल अशाच पद्धतीने निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे महायुती सरकार हे अदानी,अंबानी यांच्या नंतर अजून एका गुजराती कंपनीला टेंडर मिळवून देऊन स्थानिकांवर अन्याय करत आहे. अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली.  

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार