शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वाईन बाबतच्या निर्णयावर सरकार ठाम, काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात; गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:02 IST

कोणताही निर्णय घेतला तर तो काहीना आवडेल काहीना आवडणार नाही

सावंतवाडी : वाईन बाबतचा निर्णय हा महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षानी एकत्र बसून केला आहे. सरकार चालवताना उत्पादन वाढीबाबत काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. भाजपने ही आपल्या काळात घेतलेच होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला तर तो काहीना आवडेल काहीना आवडणार नाही. मात्र वाईन बाबत च्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.गोवा येथे  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना काहीकाळ मंत्री पाटील हे सावंतवाडी येथे माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांच्या निवास्थानी थांबले असता  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस राजु मसुरकर, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष अॅड राघवेंद्र नार्वेकर,उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, विभावरी सुकी, नागेश मोरये, संदिप सुकी, अभय शिरसाट, आदी पदाधिकारी उपस्थित होते.पाटील म्हणाले, कुडाळ नगरपंचायत सत्तास्थापनेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच राहू. परंतु नगराध्यक्ष पदाबाबत काँग्रेस म्हणून आमच्या काय अपेक्षा आहेत याबाबत लवकरा शिवसेनेशी चर्चा केली जाईल असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मधल्या काळात काँग्रेसला वाईट दिवस आले हे सत्य आहे. परंतु राजकारणात प्रत्येक पक्षाला यातून जावे लागते. अलीकडेच नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला यश आले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही संचालक म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून जिथे शक्य आहे तिथे महाविकासआघाडी अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्ष ताकतीने उतरणार असेही त्यांनी नमूद केले.राज्यात वाईन विक्रीला परवानगी दिल्याने विरोधक राजकीय रंग देऊन विनाकारण जनतेची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संयुक्तिक आहे असे सांगत  असतानाच काही कठोर निर्णय सरकार म्हणून करावे लागत असल्याचेही ते म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महा विकास आघाडी म्हणून काम करत असताना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्या बाबतचा तक्रारी आपल्या कानावर आल्या आहेत. या संदर्भात जिल्ह्याचा समन्वयक म्हणून मी  काम करत आहे.  महाविकासआघाडी म्हणून काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन जाण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला योग्य ते झुकते माप देणे बाबत आपला प्रयत्न राहणार आहे. असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेमध्ये आमचा फॉर्मुला हा महाविकासआघाडी म्हणूनच असणार आहे परंतु नगराध्यक्षपदाबाबत आमची अपेक्षा काय असेल याबाबत निश्चितच चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.अदयाप निवडणुक लाब असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील