शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सुजाण मतदारांचे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंचे मत

By अनंत खं.जाधव | Updated: September 5, 2023 17:38 IST

सावंतवाडीत लोकशाही जीवन प्रणाली व शिक्षण यावर परिसंवाद 

सावंतवाडी : भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले. परंतु लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले आहे. सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान, बलस्थान आहे असे मत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मांडले.राज्य निवडणूक आयोग, भोसले नॉलेज सिटी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यावतीने आज, मंगळवारी भोसले नॉलेज सिटी येथे लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशपांडे बोलत होते.देशपांडे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा विचार करता अजून काही घटक परीघाबाहेर आहेत त्यांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. आज भारतात तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरुण मतदार 5.5% आहेत त्यापैकी 0.68% इतक्याच तरुण मतदारांचे नाव मतदार यादीत आहे हे चित्र बदलले पाहिजे.मतदानाप्रती असलेली उदासीनता ही चिंतेची बाब आहे. युवा मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे त्यांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. या संदर्भात लोकशिक्षण महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही लोकशाही गप्पाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.प्रकाश परब म्हणाले, सध्या समाजाची दोन विभागात विभागणी झाली आहे. आभाषी  समाज आणि डिजिटल समाज अशी ही विभागणी आहे. सोशल मीडियाने जग व्यापले आहे. अशा परिस्थितीत लोकशाही समोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग हा लोकशाहीचा आत्मा आहे असे परब यांनी स्पष्ट केले.अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी आपण शेती क्षेत्रात उतरलो रसायनमुक्त अन्नधान्य मिळणे या पुढच्या काळात महत्त्वाचे आहे भविष्यात अन्नाचे दुर्भक्ष जाणवणार आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतः पुरते का होईना शेती केली पाहिजे कोरोनाचे संकट येईल असे दहा वर्षापूर्वी कोणाला वाटले नव्हते परंतु ते आले हीच बाब अन्नाच्या दुर्लक्षा बाबत होणार आहे असे सांगितले.या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार  जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी, हसन खान हे युवा प्रतिनिध सहभागी झाले होते.तर जिल्हाधिकारी किशोर तावडे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसीलदार श्रीधर पाटील भोसले नॉलेज सिटी चे अच्युत सावंत भोसले यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdemocracyलोकशाहीElectionनिवडणूकVotingमतदान