शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 17, 2024 19:17 IST

कुडासे धनगरवाडी येथील घटना : रस्त्याला नदीचे स्वरूप, भातशेतीही घुसले

वैभव साळकरदोडामार्ग : ताडपत्री घालून तात्पुरती डागडुजी केलेला तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला शनिवारी भगदाड पडले. ही घटना कुडासे धनगरवाडी येथे घडली. कालव्याचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. तसेच ते भातशेतीतही घुसले. लागलीच या घटनेची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला.भगदाड पडलेल्या कालव्याच्या ठिकाणी एक मोरी आहे. कालव्यालगतच्या डोंगराळ भागातील पाणी या मोरीतून सखल भागात जाते. या कालव्याच्या बांधकामास जवळपास २५ ते ३० वर्षांचा कालावधी लोटला आहे. परिणामी ही मोरी खचली. मात्र याकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले व याचा विपरीत परिणाम शनिवारी सकाळी जाणवला आणि कालव्याला भगदाड पडण्याची दुर्दैवी घटना घडली.

गोव्याला जाणारे पाणी तीन आठवडे बंद राहणारपरिणामी गोव्याला होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. शिवाय सध्या पाऊस पडत असल्याने काम सुरू करण्यास अडचणी येणार आहेत. तरीही लवकरच काम सुरू केले जाईल असे कार्यकरी अभियंता विनायक जाधव यांनी सांगितले. शिवाय गोव्याला जाणारे हे पाणी दोन ते तीन आठवड्यांसाठी बंद राहणार असल्याचेही ते म्हणाले. फुटलेल्या कालव्याची पाहणी दोडामार्ग (गोवा) येथील जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अधिकारी आनंद पंचवाडकर यांनी केली. तसेच पाणी बंद झाल्यामुळे गोव्यावर पाणीटंचाईचे सावट आल्याचे ते म्हणाले.

अधिकाऱ्यांना धरले धारेवरकालव्याला भगदाड पडल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी पत्रकारांना दिली. शिवाय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनादेखील कळविले. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कालव्यातून पाणी प्रवाह बंद करण्यात आला. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दिवसा घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु जर हीच घटना रात्री घडली असती तर याला जबाबदार कोण ठरला असता, असा सवाल उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे यांनी विचारला. तसेच जलसंपदा विभाग हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाTilari damतिलारि धरण