शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे व्हिजनच नाही, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला

By सुधीर राणे | Updated: November 23, 2023 11:40 IST

जिल्ह्याचे प्रश्न किती वेळा मांडले?

कणकवली : भाजपाचे आमदार नितेश राणे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापलीकडे कोणतेही व्हिजन नाही. त्यांनी भाजपा प्रवक्ते म्हणून कितीवेळा जिल्ह्याचे प्रश्न मांडले. एकदा तरी जिल्ह्यातील शेतकरी किंवा अन्य कामासंदर्भात आवाज माध्यमांमधून उठवला का? असा सवाल उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे.तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवारी सिंधुदुर्गातील खळा बैठकांच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी थेट संवाद साधणार आहेत, त्यासाठी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, उपशहर प्रमुख महेश कोदे, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कलमठ येथे खळा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांचा दौरा हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी आहे. कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे त्यांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर खळा बैठकीच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधतील.चौकट

भाजपच्या नेत्यांनी दिशाभूल करू नयेशेतकरी फळ पीक विम्यासाठी शासनाने रिलायन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. त्या कंपनीकडे प्रशासकीय वेदर डाटा उपलब्ध नाही. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ हवामान केंद्र मंजूर केली होती. त्यापैकी १८ केंद्रांवर अद्यापही यंत्रणा नाही. आता नव्याने विमा काढण्यासाठी त्या विमा कंपनीचे पोर्टल उघडलेले नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. शेतकऱ्यांसाठी कोण काय करतो हे शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही.

३० जूनला विमा जाहीर करण्याची मागणी करणारखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विमा कंपनीचे अधिकारी यांना बोलावून ३० जूनला विमा जाहीर करण्याची मागणी करणार आहोत तसेच आता विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे करणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Satish Sawantसतीश सावंत