शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही कालवे बंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 24, 2025 14:30 IST

४८ तासातील दुसरी घटना 

वैभव साळकरदोडामार्ग : तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याची जलवाहिनी कोसळून ४८ तास पूर्ण होण्याआधीच शुक्रवारी कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले. विशेष म्हणजे कोसळलेल्या जलवाहिनीप्रमाणेच या कालव्याचीही गेल्यावर्षी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे दुरुस्तीच्या नावावर खर्ची घातलेला लाखोंचा निधी पाण्यात गेल्याने तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शिवाय दोन्ही कालवे फुटल्याने गोव्याचा पाणीपुरवठाही अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.तिलारी धरणाला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी दुरुस्तीवर खर्च होऊनही तिलारी धरणाच्या कालव्याना गेल्या काही वर्षात लागलेले फुटीचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे चित्र सध्या आहे. दोन दिवसांपूर्वीच तिलारीच्या उजव्या कालव्याची गतवर्षी दुरुस्ती केलेली जलवाहिनी कोसळल्याने उजव्या कालव्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. या घटनेला ४८ तास उलटले नाहीत. त्याआधीच कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले.विशेष म्हणजे याच ठिकाणी गतवर्षी कालव्याची दुरुस्ती केली होती. त्याकरिता लाखोंचा निधी खर्ची घातला गेला. पण तरीसुद्धा सहा महिन्याच्या आत कालव्याला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे कालव्याचे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतजमिनित घुसल्याने नुकसान झाले. दरम्यान लागोपाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे तिलारी प्रकल्पाच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकरी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने असे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.त्याच - त्याच ठेकेदारांना दिली जाताहेत कामे तिलारी धरणाच्या कालव्यांची कामे करणारे ठेकेदार मोजकेच आहेत. त्याच त्या ठेकेदारांना वारंवार दुरुस्तीची कामे देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे अनेकदा समोर आले आहे .मात्र तरीसुद्धा त्याच -त्याच ठेकेदारांना कामे देण्याची मेहरबानी अधिकाऱ्यांकडून का ? केली जाते याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करा : अंकुश जाधवतिलारी धरण अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. त्यांचे ठेकेदारांशी असलेल्या साटेलोट्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असून कालवे फुटत आहेत. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांची प्रथम चौकशी व्हावी अशी मागणी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाWaterपाणीTilari damतिलारि धरण