शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

विक्रमी दर : पावसाने मारले, पीक परिस्थितीपुढे हरले तरीही...

By admin | Published: March 15, 2015 12:22 AM

उत्पादन घटल्याने रत्नागिरीच्या काजूला सोन्याचा भाव

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी अवकाळी पावसाचा फटका बसला असला, तरी एकूणच हवामानातील बदलांमुळे काजू पिकाची उत्पादकता घटल्याचे दिसून येत आहे. उत्पादन कमी असल्यामुळे काजू बीच्या दरामध्ये मात्र तेजी दिसून येत आहे. सध्या ९० ते १०५ रूपये दराने काजू बी खरेदी करण्यात येत आहे. मात्र, हा दर काजूच्या दर्जानुसारच ठरत आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. गतवर्षी १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी पावसाळा लांबल्याने थंडीही लांबली त्यामुळे मोहोर प्रक्रियाच उशिरा सुरू झाली. त्यामुळे गतवर्षी ८५ ते ७५ रूपये किलो दराने काजू खरेदी करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १०५ रूपयांपासून काजू बीला दर उपलब्ध झाला. काजूच्या दर्जावर दर ठरत आहे. हायब्रीड काजू १०० ते १०५ रूपये दराने खरेदी करण्यात येत आहे. काजू पिकावर पावसाचा परिणाम जाणवणार नसल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, काजू बी पिकल्यानंतर पाऊस आल्यास त्याचा परिणाम जाणवू शकतो. हवामानामुळे काजू बीच्या उत्पादनाबरोबर दर्जावरही परिणाम झालेला दिसून येत आहे. बी आकाराने लहान दिसून येत आहे. त्यामुळे प्रति किलोला १६५ ते १७० नग इतकी मोठ्या आकाराची बी प्राप्त होते. तर छोट्या आकाराची १८० ते २०० नग बी प्राप्त होते. अवकाळी पावसामुळे सध्या काजू बीमध्ये १३ ते १६ टक्के मॉश्यूरायझर आढळत आहे. त्यामुळे ही बी वजनाला जास्त भरत आहे. एकूण हवामानामुळे ४० टक्के पिकाचे नुकसान झाले असले तरी ६० टक्के पिक हातात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे मोहोरावर बुरशीचा प्रादूर्भाव झाला होता. परंतु, वातावरणात उष्मा भरपूर असल्याने बुरशीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेवटच्या टप्प्यातीलही काजू हातात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काजू विक्रेते निवडक दर्जेदार काजू बी खरेदी करतात. त्यामुळे शहरात आणून बी निवडूनच काट्याला लावली जाते. यावर्षी उत्पादनावर परिणाम झाल्याने दर टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.