शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
3
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
4
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
5
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
6
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
7
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
8
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
9
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
10
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
11
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
12
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
13
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
14
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
15
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
16
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
17
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
18
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
19
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
20
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा

कोकणातील दहशतीचे समूळ उच्चाटन करू

By admin | Published: July 11, 2016 12:03 AM

दीपक केसरकर : कायदा, सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध

सावंतवाडी : जिल्ह्याला प्रथमच मिळालेले गृहराज्यमंंत्री पद हे कोकणच्या विकासाचे नवे द्योतक असून, भयमुक्त आणि संस्कारशील कोकण निर्माण करण्यासाठी येथील राजकीय दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी आपण पूर्ण क्षमतेने पेलू. तसेच राज्यातील पोलिस दलाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच विशिष्ट काळात दहशत घालणाऱ्यांना कायमचा धडा शिकवून राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यास आपले प्राधान्य राहील, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व नव्याने मिळालेल्या गृह खात्याचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. गृहखात्याचा कारभार मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेत नवीन खात्याच्या कारभाराबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शब्बीर मणियार, राकेश नेवगी, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, संस्कारशील कोकणातील सर्वसामान्य जनतेने अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जी वृत्ती दाखविली, त्यातूनच आपल्या कारभाराची सुरुवात झाली. आपणास राज्याचे नेतृत्व करण्याची मिळालेली संधीही त्याचाच भाग असून, उद्धव ठाकरे यांच्या कोकणावरील प्रेमामुळे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू विश्वासामुळेच हे पद आपणास मिळाले आहे. अलीकडील काही काळात कोकणाचे बदनाम झालेले नाव पुन्हा उजळण्याची ही संधी असून, त्याचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोने केले जाईल. राजकीय निवडणुकीदरम्यान काही विशिष्ट मंडळींकडून राडे घातले जातात, त्यांनाही आवर घालत भानावर आणून कोकणातील सर्वसामान्यांना भयमुक्त जगणे निर्माण करण्याची आपली विशेष मोहीम असेल. त्यामुळे अशा मंडळींनी याची दखल घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिस दलाच्या प्रलंबित अडचणींसह पोलिसांच्या सद्य:स्थितीतील राहत्या घरांची पाहणी करून त्यांची तात्पुरती आणि तत्काळ डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधा व पोलिसांसाठी आवश्यक साधनसामग्री पुरवून, पोलिस दल अधिक सजग करण्यावर आपला भर राहील. (वार्ताहर) ही धमकी नव्हे... अलीकडील काही वर्षांत दहशतीने जिल्ह्याचे नाव बदनाम झाले होते. कोकणचा समृद्ध व संस्कारशीलतेचा वारसा असा सहजासहजी मिटणारा नाही. अशा प्रवृत्तींना वेसन घालून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला जाईल आणि ही धमकी न समजता कोकणच्या खऱ्या संस्कृतीची प्रचिती असल्याचे ठामपणे केसरकर यांनी सांगितले. आरोप करणाऱ्यांचे काळे धंदे ४विरोधकांकडून अवैध धंद्यांच्या होणाऱ्या आरोपाला केसरकर यांनी आक्रमक होत, अवैध धंदे असणारेच जिल्ह्याचे व शहराचे नाव बदनाम करीत आहेत. ४त्यांनी वेळीच आपल्या जिभेला मर्यादा घालावी, अन्यथा बापूसाहेब महाराजांचा वारसा असणाऱ्या संस्कारी नगरीला गालबोट न लागण्याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सांगितले.