शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

ठेकेदाराचा कळवळा का ?

By admin | Published: August 30, 2016 10:49 PM

भालचंद्र साठेंचा जठारांना सवाल : नौटंकीबहाद्दरांची ताकद राज्याने अनुभवलीय

वैभववाडी : आमदार नीतेश राणे यांची ताकद संपूर्ण राज्याला माहित असून त्यांची हिमंत डंपर आंदोलनात सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे प्रमोद जठारांसारख्या नौटंकी बहाद्दरांनी नीतेश राणेंना आव्हान देऊ नये, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना पोपटपंची करण्यात पटाईत असलेल्या जठारांना धरणाच्या ठेकेदाराचा कळवळा का? असा सवाल साठे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा ठेकेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला शनिवारी टाळे ठोकले. त्यामुळे सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, नासीर काझी, युवक तालुकाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण, स्वप्नील खानविलकर, रितेश सुतार आदी उपस्थित होते.भालचंद्र साठे पुढे म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सरकार सोडवायला तयार नसल्याने त्यांनी नीतेश राणेंना बैठक घेण्याची विनंती केली होती. पुनर्वसनाच्या कामाची काहीच प्रगती नसताना धरणाच्या पिचींगचे काम मात्र दोन वर्षे सुरु आहे. त्यामुळेच ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय शासन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही. याची खात्री झाल्यामुळेच आमदार राणे यांनी टाळे ठोकले. परंतु, ठेकेदाराचा जठारांना एवढा कळवळा का यावा. ते आमदार असताना त्यांना ठेकेदाराकडून आर्थिक लाभ होत होता की काय? असे प्रश्न साठे यांनी उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, भू-भाडे देताना ठेकेदार सहमतीपत्रावर जमीनदारांच्या सह्या घेत आहे. कालवे किंवा धरणाच्या उत्खननासाठी लागणारी जमीन कंपनीच्या नावावर खरेदी करून ठेकेदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीत ठेकेदार जबरदस्तीने उत्खनन करीत आहे. तरीही सत्ताधारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार ठेकेदाराची बाजू घेतात याचे आश्चर्य वाटते. आमदार नीतेश राणेंची कृती स्टंटबाजी म्हणता मग पंचायत समिती इमारतीचा विषय ज्या पध्दतीने हाताळला ती जठारांची स्टंटबाजी नव्हती का? त्या ठेकेदाराने प्रमोद जठार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही दिले नाही; म्हणून तो विषय त्यांनी पेटवला काय? असा सवालही भालचंद्र साठे यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)संघर्ष समितीमुळेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रेंगाळलेअरुणा प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर २00७ मध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाची गरज नाही. आमचे प्रश्न आम्हीच सोडवू, अशी भूमिका प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीने घेतली होती. ती भूमिका घेणारे रंगनाथ नागपच होते. संघर्ष समितीची भूमिका नारायण राणे यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच अरुणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले. तेच रंगनाथ नागप आता प्रमोद जठारांच्या मांडीवर बसून बोलत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व अन्य प्रश्न रखडण्यास संघर्ष समितीची ती भूमिका आणि पर्यायाने रंगनाथ नागप हेच जबाबदार आहेत, असे भालचंद्र साठे यांनी स्पष्ट केले.धरणावर जठारांच्या मशिनी असल्याचा संशयभाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काँग्रेस पक्षाच्या दुकानदारीची काळजी करु नये. त्यांनी स्वत:च्या राजकीय भवितव्याचे बघावे, असा सल्ला बांधकाम सभापती दिलीप रावराणे यांनी दिला आहे. जठार यांनी प्रकल्पग्रस्तांना सोडून ठेकेदाराची बाजू घेतल्यामुळे धरणावर प्रमोद जठारांच्या मशीनरी भाड्याने असल्याचा आम्हाला संशय येतो. त्यामुळेच ठेकेदाराचे काम बंद राहीले तर मशीनरीचे भाडे बुडण्याची भीती वाटत असल्यानेच जठार ठेकेदाराची बाजू घेत असावेत, असा आरोप दिलीप रावराणे यांनी केला आहे.