शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला नवीन बसेस कधी मिळणार?, प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 1:50 PM

सध्या फक्त ३५२ बस उपलब्ध : फेऱ्यांवर परिणाम; किमान ९८ बसची आवश्यकता 

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सन २०१९-२०च्या सुमारास दररोज २१००च्या जवळपास फेऱ्या सुटायच्या. आता त्यांची संख्या १८००वर आली आहे. मात्र, त्यावेळी सिंधुदुर्ग विभागाकडे उपलब्ध बसेसची संख्या ४५०हून अधिक होती, ती आता ३५२वर आली आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या फेऱ्याही टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अजून किमान ९८ बसची आवश्यकता असून, सिंधुदुर्ग विभागाला या नवीन बसेस कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला सन २०१९-२० पासून फक्त नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत. त्यावेळी या विभागात कार्यरत बसेसची संख्या ४५०हून अधिक होती. मात्र, टप्प्याटप्प्यात या बसेसचे आयुष्यमान संपत गेले. शासनाकडून नवीन बसेस न आल्याने आयुष्यमान संपलेल्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या घटत गेली. या समस्येकडे शासन तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.एसटीचा सिंधुदुर्ग विभाग आजही पूर्ण क्षमतेने चालवायचा असेल, तर किमान ४५० सुस्थितीतील बसेसची गरज आहे. परंतु, या विभागाकडे ३५२ बसेस चालू स्थितीत आहेत. पाच वर्षांपूर्वी या विभागाकडून प्रत्येक दिवशी साधारणतः २१००च्या जवळपास बसफेऱ्या सुटत होत्या. त्यातच सुमारे ८० हून अधिक बसेस या कालावधीत भंगारात गेल्या, त्यामुळे या फेऱ्या पुढे कशा सुरू ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले होते. सिंधुदुर्गमध्ये चार आगारांमध्ये या बसेससाठी चार्जिंग स्टेशनही तयार करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप या इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत.सिंधुदुर्ग विभागाला पुढील महिनाभरात काही बसेस मिळतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण मार्च २०२५ पर्यंतचा विचार केला, तर सध्या कार्यरत असलेल्या बसपैकी अजून सुमारे ४० ते ५० बसेस १५ वर्षे पूर्ण झाल्याने भंगारात काढाव्या लागणार आहेत. तोपर्यंत आवश्यक बसेस न आल्यास या विभागातील १८०० फेऱ्यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग