शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?

By admin | Published: July 07, 2017 12:50 AM

बेशिस्त वाहतुकीला लगाम कोणाचा ?

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करू पाहणाऱ्या रत्नागिरी शहरात अपघात होणे, ही बाब आता नित्याची झाली आहे. कोणीही यावे व बेदरकारपणे अपघात करून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नियम पाळून वाहने चालवणाऱ्यांचे जीव या बेदरकार वाहनचालकांसाठी जणू स्वस्त झालेत की काय, सामान्य वाहनचालकांच्या जीवाशी बेशिस्त वाहनचालक किती काळ हा खेळ खेळणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमध्ये उमटत आहे. या बेशिस्त व बेदरकार वाहतुकीला लगाम घालणार कोण, असा संतप्त सवालही केला जात आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांना न पेलवण्याइतकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक नियमनासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते व रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त समितीचे गठन करून शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा चांगला प्रयत्नही झाला. गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या वाहतूक नियमन व्यवस्थेचा परिणाम सुरूवातीच्या काळात चांगला दिसून आला. मात्र, नंतर त्यामध्ये शिथिलता आली. भरधाव वेगाने वाहने हाकणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्याने दररोज भर गर्दीच्या वेळी ‘पळा पळा कोण पुढे पळेतो...’ अशी अतिवेगाने वाहनांची स्पर्धाच होत असल्याचे दिसून येत आहे. या वेगवान वाहने हाकणाऱ्यांना आवरले नाही तर यापुढेही नियम पाळणाऱ्यांना मुठीत जीव घेऊनच वाहने चालवावी लागणार आहेत.शहरात वाढत असलेल्या वाहतुकीतील बेशिस्तीमुळे नियम पाळून वाहने चालवायची की नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य वाहनचालकांना पडला आहे. रस्त्यांवरून दाटीवाटीने जाणाऱ्या वाहनांच्या मधील गॅप शोधत आपण आॅलिम्पिकमध्ये उतरल्याच्या तोऱ्यात वाहने चालविण्याचे प्रकार सतत होत आहेत. बेशिस्तीचा हा तोरा खरोखरच उतरवण्याची यंत्रणा शहरात आहे काय, असा प्रश्नही विचारला जात आहे. रत्नागिरी शहरात बेदरकारपणे, बेशिस्तपणे, अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, एखादे वाहन अतिवेगाने शहरात येत आहे किवा जात आहे, त्याद्वारे अपघात होत आहेत, ब्रेक फेल झाल्याने वाहन अतिवेगात आहे, कोणाला तरी डॅश केल्याने त्या वाहनाचा पाठलाग होत असल्याने गाडी अतिवेगाने पळवली जात आहे, असे घडत असताना त्याचा संदेश पोलिसांपर्यंत वेळेत पोहोचतो का, यासारखे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शहरातील वाहने लक्षात घेता वाहतूक शाखेतील कर्मचारी वाढणेही गरजेचे असल्याचा मुद्दा पुढे येत आहे.वाहतूक विभाग अलर्ट : तीन महिन्यात दोन लाख रूपयांचा दंडरत्नागिरीतील वाहतूक व्यवस्थेबाबत बोलताना वाहतूक पोलीस निरीक्षक अयुब खान म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात रत्नागिरी शहरात अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या १५९ वाहनचालकांना १ लाख ९७ हजार रुपये दंड करण्यात आला. या सर्वांचे वाहन परवाने निलंबित करावेत, असा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन विभागाला नुकताच पाठविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडे ४ वॉकीटॉकी असून, बंदोबस्त व महत्त्वाच्या वेळी त्याचा वापर होतो. अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचे नंबर पुढील नाक्यावरील पोलिसांना तत्काळ दिले जातात, असेही खान यांनी सांगितले.