शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

पावसासह वन्यप्राण्यांचा धुडगूस

By admin | Published: October 21, 2015 9:52 PM

भात कापणीचा हंगाम : कडावल-हिर्लोक परिसरातील शेतकरी चिंतेत

सुरेश बागवे -कडावल व हिर्लोक परिसरात खरीप भात कापणीस सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडले असून, अंतिम टप्प्यात आलेली शेती कशी वाचवायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. हिर्लोक येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगार्इंनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका यंदा शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासूनच बसत आहे. तरवा लावणीच्यावेळी गरज असताना पाऊस गायब झाला. आता भातकापणीवेळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच वन्य प्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. पावसाचे अरिष्ट आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत कडावल परिसरातील शेतकरी सापडला आहे. परिसरात हळव्या जातीचे काही वाण गणेशोत्सव कालावधीतच कापणीयोग्य झाले होते. मात्र, गणेशोत्सव व त्यानंतर म्हाळवसाच्या धामधुमीमुळे शेतकऱ्यांना भातकापणीचा मुहूर्त करता आला नाही. आता काही प्रमाणात भातकापणीस सुरूवात झाली असली, तरी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पावसामुळे भातकापणीत वारंवार अडथळा येत आहे. याचा परिणाम भात उत्पादन व वैरण उत्पादनावर होणार आहे. भातलावणीनंतर कडावल व हिर्लोक पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गवे व वनगार्इंनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते आणि आता भात कापणी हंगामातही हा उच्छाद सुरूच आहे. येथील आपट्याची मळी, सतीचा उचवळा, भिकेडोंगरी, दासशेळ भागातील शेती गवे व वनगाईनी उद्ध्वस्त केली असून, दत्ताराम बागवे, सीताराम सावंत, एकनाथ बागवे, प्रदीप साटम, सुवर्णा साटम तसेच इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी हैराणशेतीवर पावसाचे संकट कायम असतानाच दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. कडावल परिसरातील कडावल, आवळेगाव, पांग्रड, निरूखे आदी तर हिर्लोक पंचक्रोशीमधील किनळोस, हिर्लोक, कुसगाव, गिरगाव, नारूर, रांगणातुळसुली व निवजे आदी गावांमध्ये गवे व वनगार्इंचा उपद्रव वाढला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे तरवा लावणीपासून हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत वन्य प्राण्यांचा उपद्रव येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.शेतकरी निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलायंदा निसर्गाच्या दृष्टचक्राचा फटका शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरूवातीपासून बसत आहे. गरज असतेवेळी पाऊस गायब झाला. आता भातकापणीच्या हंगामात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यातच वन्यप्राण्यांनीही धुडगूस घालायला सुरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले असून, शेती वाचवायची कशी, या विवंचनेत सापडले आहेत.