शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

काजूबोंडूवरील वाइन निर्मिती प्रकल्पाला चालना देणार -पणन मंत्री जयकुमार रावल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:25 IST

काजू अनुदानातील शेतकरी वंचित राहणार नाहीत

कणकवली : सिंधुदुर्ग बाजार समितीच्या या मार्केट यार्डमधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल. पुढील १८ महिन्यांत या इमारतींचे काम पूर्ण करत लोकार्पण होण्यासाठी सर्वांना काम करावे लागेल. येथील काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी येथे वाइन निर्मितीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे ३७० कोटी रुपयांच्या काजू वाइन प्रकल्पाला पुढील काळात चालना दिली जाईल. मार्केट यार्डच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींसाठी ५ कोटी ६६ लाख रुपये लागणार असून, त्यापैकी ७५ टक्के रक्कम सिंधुरत्न योजनेमधून देण्यात आली आहे, तर ॲग्रीकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधून १ कोटीची रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मार्केट यार्डच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिंदेसेनेचे उपनेते संजय आग्रे , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते

१५ दिवसांत आंबा महोत्सव घ्यावामंत्री रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आमच्या विभागामार्फत काजूबोंडू प्रकल्प, फळप्रक्रिया योजना, कात प्रकल्प असे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. पणनमार्फत आंबा व मत्स्य वाहतुकीसाठी तरुणांना १० कोल्डस्टोरेज ट्रक देण्यात येणार आहेत. दरवर्षी आंबा महोत्सव आम्ही मुंबई आणि पुण्यामध्ये भरवतो. त्याच धर्तीवर येत्या १५ दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समितीने आंबा महोत्सव घ्यावा, त्यासाठी पणनकडून १ लाख रुपयांची आम्ही मदत करू. कुडाळ-मालवण मतदारसंघात आमदार नीलेश राणेंच्या मागणीनुसार पॅकिंग हाऊसची योजना करण्यात येईल. येत्या १८ महिन्यांत काम पूर्ण करू आणि मार्केट यार्डचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री, तसेच अन्य मंत्र्यांना आमंत्रित करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यांच्यावर कडक कारवाई करावीपालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नारायण राणेंनी जे काही विचार येथे मांडले आहेत, त्यानुसार त्यांचा ७५ व्या वाढदिवस साजरा केला जाईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे ४ लाख झाले पाहिजे. देवगड आणि वेंगुर्लेच्या नावाने बाहेरील राज्यातील आंबे विकले जात आहेत. त्यामुळे कृषी आणि पणन अधिकाऱ्यांना सूचना करतो की, त्याच्यावर कडक कारवाई करावी. निवडणुका संपलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे हेवेदावे, राजकारण न करता जिल्ह्यासाठी जे काय करायचे आहे, ते मी करणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग