शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कणकवलीतील विजयाने मिळणार राणेंच्या राजकारणाला उभारी ?

By balkrishna.parab | Updated: April 13, 2018 09:38 IST

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत विजयाने नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र या निकालामुळे नारायण राणेंच्या धडाकेबाज राजकारणाला उभारी मिळणार का?

किरकोळ आरोप प्रत्यारोप वगळता शांततेत पार पडलेल्या आणि स्थानिक पातळीवरील सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत अखेर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली. एकूण 17 जागांसाठी झालेल्या मतदानात 11 जागा जिंकून स्वाभिमान-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजपा-शिवसेना युतीला मात दिली. त्याबरोबरच अटीतटीच्या झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संदेश पारकर यांना मात देत त्यांचे कणकवलीतील वर्चस्व मोडीत काढले. कणकवली नगरपंचायतीच्या निकालाचे थोडक्यात विश्लेषण करायचे झाल्यास या निकालांमुळे शिवसेना भाजपा-युतीला धक्का बसलाय, तर नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र या निकालामुळे नारायण राणेंच्या धडाकेबाज राजकारणाला उभारी मिळणार का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खरंतर नारायण राणेंनी स्वतःचाच पक्ष सोडत भाजपाकडून खासदारकी मिळवल्यानंतरही त्यांचा पक्ष भाजपाविरोधात कणकवलीच्या निवडणुकीत उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच काँग्रेस सोडल्यानंतर राणेंच्या पुढील वाटचालीबाबत निर्माण झालेला गोंधळ आणि भाजपाने त्यांना आपल्या पक्षात घेण्यास केलेली चालढकल यामुळे आता राणेंचे राजकारण संपले, अशी हाकाटी काही जणांनी सुरू केली होती. त्यामुळे पक्षाची दाखवून देण्याचे आव्हान नारायण राणेंसमोर होते. हे आव्हान स्वतः राणे, त्यांचे दोन्ही पुत्र आणि स्वाभिमानच्या असंख्य कार्यकर्त्यांनी लीलया पेलले. एकेकाळी कोकणात एकहाती वर्चस्व राखणाऱ्या राणेंची गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्गातील बालेकिल्ल्यातच कमालीची पिछेहाट झाली आहे. नाही म्हणायला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राणे समर्थकांनी लक्षणीय यश मिळवले होते. पण काँग्रेस सोडून वेगळा पक्ष काढत स्वतःची स्वतंत्र वाटचाल सुरू केल्यापासून राणेंच्या नेतृत्वाची खरी लढाई सुरू झाली आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक जिंकली तरी राणेंसमोर खरे आव्हान असेल ते 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्याचे. पुढच्या वर्षी सिंधुदुर्गातील तिन्ही आमदार आणि आणि एक खासदार हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असेल अशी गर्जना राणेंनी कणकवलीतील विजयानंतर केली आहे. पण राणेंसाठी ही गोष्ट तितकीशी सोपी नाही. एकीकडे बदलत्या राजकीय परिस्थितीत अपरिहार्यता म्हणून भाजपाने शिवसेनेशी जुळवून घेण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास शिवसेना सिंधुदुर्गातील आपल्या ताब्यातील एकही मतदारसंघ सोडण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत लोकससभेचा रत्नागिरी-सिंधुदुर्गं मतदारसंघ आणि सावंडवाडी-वेंगुर्ला व कुडाळ-मालवण हे विधानसभा मतदारसंघ सेनेसाठी सोडून कणकवली-देवगड हा मतदारसंघ राणेंच्या स्वाभिमान पक्षाला देणे भाजपाच्या हातात असेल. त्यातही राणेंशी हाडवैर असल्याने शिवसेना स्वाभिमानला पाठिंबा देणार नाहीच. पण सेना-भाजपा युती झाली नाही तर मात्र भाजपाशी आघाडी करून आपल्या मर्जीतील उमेदरवार उतरवण्याची संधी राणेंना मिळू शकते. पण कणकवली-देवगड मतदार संघाचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी राणेंना मोठा संघर्ष करावा लागू शकतो. पण नुकत्याच झालेल्या पिंगुळी पंचायत समिती पोटनिवडणूक आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सेना-भाजपा युतीला धूळ चारल्याने पक्षामध्ये नवा विश्वास जागा झाला आहे. त्याचा फायदा राणे आणि त्यांच्या पक्षाला नक्कीच होईल. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षsindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण