शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:58 IST

Tauktae Cyclone VaibhavNaik Sindhudurg : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे

ठळक मुद्देहे तर कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम : वैभव नाईक यांची टीका केंद्रीय समितीकडून नुकसानग्रस्त भागाची आता पाहणी

कणकवली : तौक्ते चक्रीवादळ येऊन तब्बल २२ दिवस उलटले आणि आता केंद्रीय समितीचे पथक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहणीसाठी दाखल झाले आहे. मात्र गुजरातमध्ये वादळ धडकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने पाहणी दौरा करून एक हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते.

महाराष्ट्र राज्यात मात्र केंद्राकडून ही तत्परता दाखवण्यात आली नाही. महाराष्ट्र राज्याला मदत न करता केंद्रीय समितीच्या पथकाने केवळ पाहणी दौरा करून नुकसानग्रस्त कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, अशी टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहेयाबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर राज्यांना मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच असते. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत दुजाभाव करत आहे.

तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी आवश्यक निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे.त्याची कार्यवाही पूर्णत्वास नेली जात असून दोन दिवसांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. याबद्दल केंद्रीय समितीने राज्य सरकारचे कौतुक करणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय समितीने जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीकेली.केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात नारायण राणेंना डावललेजिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आलेले विरोधी पक्षनेते व जिल्ह्यातील भाजपचे खासदार यांनी आपले वजन वापरून राज्याला केंद्राकडून मदत मिळवून देणे अपेक्षित आहे. मात्र केंद्रीय समितीने तब्बल २२ दिवसांनी सिंधुदुर्गमध्ये येऊन केवळ पाहणीच केली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे खासदार नारायण राणे व स्वयंघोषित भाजप नेते यांचे केंद्रात किती वजन आहे, हे यानिमित्ताने आपल्याला दिसून येते.केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यात राणेंना स्थान दिले जात नाही. यावरून केंद्रातील भाजप सरकारमध्ये त्यांची किती केविलवाणी अवस्था झाली आहे, हे एव्हाना जिल्हावासीयांना कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपली पात्रता ओळखावी, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळShiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग