शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:06 PM

गेल्या काही काळापासून विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत.

Air India : गेल्या काही काळापासून देशातील काही विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. यात एअर इंडियाचे नाव आघाडीवर असते. ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या तक्रारींची बरीच चर्चा होते. आता एअर इंडियाच्या बंगळुरू-पुणे फ्लाईटबाबत एका प्रवाशाने तक्रार केली आहे. एका स्टार्टअप कंपनीचे उपाध्यक्ष असलेल्या आदित्य कोंडावार यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे एअर इंडियाबाबत संताप व्यक्त केला.

त्यांनी म्हटले की, 'प्रिय एअर इंडिया, काल रात्री मला एक खास धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी हे पूर्ण गांभीर्याने बोलतोय, मी माझ्या आयुष्यात कधीही एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही. गरज भासल्यास मी 100% अतिरिक्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीचे विमान घेईन किंवा बैलगाडीतून जाईन.'

त्यांनी पुढे लिहिले, 'माझी 9.50 ची फ्लाइट 12.15/12.20 ला टेक ऑफ झाली. फ्लाईटमध्ये अतिशय घाण वास येत होता आणि सीट्सदेखील अतिशय घाण डागांनी भरलेल्या होत्या. मला टाटा समूह आणि त्यांच्या प्रमुखांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्याकडून नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा करतो.' या पोस्टनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या पोस्टला रिप्लाय दिला आणि समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले. 

कंपनीने म्हटले, 'आदित्य, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. कृपया लक्षात घ्या की, काही समस्या आमच्या नियंत्रणाबाहेर असतात, ज्यामुळे उशीर झाला. तुम्हाला विमानात झालेल्या समस्येकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्याचे त्वरित निराकरण करू.' दरम्यान, आदित्यच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन त्यांचा एअर इंडियाचा अनुभव शेअर केला.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमानSocial Viralसोशल व्हायरल